पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अधिकार्यांनी गुरुवारी (दि. 15) महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांचा संयुक्त पाहणी दौरा केला. या दौर्यात त्यांनी एमजीएम हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, देवांशी इन व टियारा हॉल या कोविड सेंटर्सची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी या सेंटर्समध्ये पुरवल्या …
Read More »रायगडास परतीच्या पावसाचा तडाखा
अलिबाग ः प्रतिनिधी मागील कित्येक वर्षांत परतीच्या पावसाने जेवढा धुमाकूळ घातला नव्हता तो यंदाच्या पावसाने घातला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत बरसलेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रायगडात कहर केला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बंगालच्या उप महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व त्याची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. 10 ऑक्टोबरपासून राज्यात …
Read More »‘आरे’चा निर्णय अंगाशी आल्यानेच ‘जलयुक्त’ची चौकशी; भाजपचा आरोप
कोल्हापूर ः प्रतिनिधी एखाद्या गावात भ्रष्टाचार झाला असेल तर संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेतच गैरव्यवहार झाल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप हास्यास्पद असल्याचा टोला मारतानाच खुशाल चौकशी करा, तुम्हाला अडवतंय कोण, असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारला दिले. राजकीय सूडभावनेने घेण्यात आलेल्या अशा …
Read More »शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी; भाजप किसान मोर्चाची मागणी
कर्जत ः बातमीदार परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतीची 100 टक्के नासाडी झाली असून या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी (दि. 15) भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवकाळी आणि वादळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील सर्व …
Read More »देवदूतांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना आधार; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान
मुंबई ः हरेश साठे कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूताप्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमीच असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. 14) राजभवन येथे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान
मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान करून बुधवारी सन्मानित करण्यात आले. या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच आयोजक …
Read More »राज्यात पावसाचा कहर; पंढरपूरमध्ये भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी
मुंबई, पंढरपूर : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, या वेळी ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी (दि. 15) दुपारी दीडच्या सुमारास …
Read More »पनवेल महापालिकेच्या 945 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या सन 2020-21च्या 945 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका उद्याने विकास, वैद्यकीय सेवा व झोपडपट्टीत नागरी सुविधा देणे आणि नवीन गटारे बांधकाम व दुरूस्तीसाठी सन 2020-21च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने पनवेल शहर स्वच्छ होण्यास मदत होऊन …
Read More »सांगडेत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, आरिवली येथे रस्त्याचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगडे येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आणि आरिवली येथे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 14) करण्यात आले. सांगडे येथे रायगड जिल्हा परिषद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जलकुंभ नळ योजनेतून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचा …
Read More »‘मेट्रो कारशेड कांजूरला नेल्याने सरकारी तिजोरीवर ताण येणार’
मुंबई : प्रतिनिधी मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न सुटणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper