पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सोमवारी (दि. 19) नव्या 143 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 13) तालुक्यातील 90, उरण 19, पेण व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, …
Read More »Monthly Archives: October 2020
पनवेल : दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नगरसेविका चारुशीला घरत, अॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, महिला मोर्चा वैद्यकीय सेल शहर अध्यक्ष ज्योती देशमाने, उपाध्यक्ष मनीषा बहिरा, बूथ अध्यक्ष वैशाली पाटील, प्रभा सिन्हा, शिवानी रावते यांनी अभिनंदन केले.
Read More »शेतकर्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन आवश्यक -डॉ. मर्दाने
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार शेतकर्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय आवश्यक असून त्यासाठी पशू प्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण या चार बाबींचे व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून व्हायला हवे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर समाज सेवा …
Read More »आदिवासी विद्यार्थिनींना सायकल वाटप
कर्जत : बातमीदार जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाईन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल …
Read More »मुरूड तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर; तहसीलदार गमन गावित यांचा दावा
मुरूड : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना येथील जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याने मुरूड तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून कोरोनामुक्त होणारा हा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे, असा दावा तहसीलदार गमन गावित यांनी केला. ते रविवारी (दि. 18) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुरूड तालुक्यात आतापर्यंत 431 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण …
Read More »नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट; नागोठण्यातील श्री जोगेश्वरी माता मंदिरात नियमांचे पालन
नागोठणे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज, व्याघ्रेश्वर मंदिरातील नवरात्र उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शासनाचे सर्व नियम पाळूनच मंदिरात नवरात्र साजरा करण्यात येत असल्याचे उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे आणि पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. या उत्सवात दरवर्षी घेण्यात येणारे कीर्तन, …
Read More »‘शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी’
माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. माणगाव तालुक्यातही भातपीक भिजून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाने तत्काळ थेट मदत द्यावी, अशी मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली …
Read More »परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान; पंचनाम्याची प्रतीक्षा; सुधागडातील बळीराजा हवालदिल
पाली : रामप्रहर वृत्त परतीच्या वादळी पावसामुळे सुधागड तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक मातीमोल झाले, मात्र मागणी करूनही या नुकसानीचे अजूनही पंचनामे केले गेले नसल्याचा आरोप तालुक्यातील शेतकर्यांनी केला आहे. सुधागड तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने …
Read More »गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे बांधकामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर भिंत बांधण्यात येणार आहे. या बांधकामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 19) शुभारंभ करण्यात आला. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर ग्रामपंचायतीच्या …
Read More »पंचनामे न करता शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत करा : डॉ. अनिल बोंडे
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. 115 लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील. त्या ऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट न दाखवता शेतकर्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी कृषिमंत्री व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper