Breaking News

Monthly Archives: April 2021

घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन कसे काय केले?

भाजपचा सवाल; खुलासा करण्याची मागणी मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. घरातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला, असा सवाल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये पोलिसांचे संचलन

मुरूड : प्रतिनिधी   राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी बुधवारी (दि. 31) मुरूडमध्ये संचलन केले. मुरुड नगर परिषद कार्यालायापासून पोलीस संचलानास सुरूवात झाली. शहरातील …

Read More »

‘त्या’ रस्त्यांची कामे रायगड विकास प्राधिकरणामार्फत करावी; स्वराज्य संघटनेतर्फे खा. छत्रपती संभाजीराजेंना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी रायगड विकास प्राधिकरणामार्फत माणगाव व महाड तालुक्यातील खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पंकज तांबे यांनी पाचाड (ता. महाड) येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची …

Read More »

आवक घटल्याने मासळी महागली; खोल समुद्रात एलइडी मासेमारी सुरू असल्याचा मच्छीमारांचा दावा

मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील  मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बाजारात फार थोड्या प्रमाणात येत असलेल्या मासळीचे भाव कडाडले आहेत. किनार्‍यालगत मासळी मिळत नसल्याने आठ दहा तास प्रवास करून मच्छीमार …

Read More »

ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज सज्ज -सुमा शिरूर

मुंबई ः प्रतिनिधी टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज आहेत, असे मत भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले आहे. भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 30 पदके मिळवत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. त्या पार्श्वभूमीवर शिरूर बोलत होत्या. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना (एनआरएआय) आणि भारतीय क्रीडा …

Read More »

शार्दुल ठाकूरला मिळाली महिंद्रांनी गिफ्ट केलेली गाडी

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेली दमदार थार एसयूव्ही गुरुवारी (दि. 1) मिळाली. याबद्दल शार्दुलने महिंद्रा यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत. अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे …

Read More »

फणसाड अभयारण्यात कृत्रिम पाणवठे

सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून, कडक उन्हामुळे भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे.त्यातच वणवे लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मार्च अखेर व एप्रिल, मे महिन्यात मुरुड तालुक्याचे तापमान 34 ते 36 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहिल्याने लोक घामाघुम झाले आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनासुद्धा मुबलक पाणी मिळावे, यासाठी फणसाड अभयारण्य …

Read More »

पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार?

आयसीसीचे मोठे पाऊल दुबई ः वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे. भारतात यंदा ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि त्या संदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे.  भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, …

Read More »

‘आरसीबी’च्या नव्या खेळाडूची वादळी खेळी

ख्राइस्टचर्च ः वृत्तसंस्था आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार्‍या न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलनने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. अ‍ॅलनचा फॉर्म आरबीसीसाठी उपयुक्त ठरू शकतो. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील तिसर्‍या ट्वेण्टी-20 सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि 10-10 षटकांचा सामन्यांना निर्णय झाला. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा …

Read More »

पंचांच्या निर्णयामध्ये बदल

दुबई ः वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान डीआरएसमधील अंपायर्स कॉलबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही यासंबंधित मुद्दा उपस्थित केला होता. आयसीसीने आता डीआरएसमध्ये काही गोष्टी बदलल्या आहेत. त्यानुसार तिसर्‍या पंचांना डीआरएसच्या बाबतीत काही अधिकार मिळाले आहेत, पण अंपायर्स कॉल कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला …

Read More »