Breaking News

Monthly Archives: August 2021

…अन्यथा महाराष्ट्रातील रस्त्यांची कामे थांबवावी लागतील -नितीन गडकरी

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात असून हे असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये म्हणून आपण …

Read More »

कर्नाळा बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 529 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्नाळा बँकेचा परवाना अखेर रद्द केला आहे. गुंतवणूकदारांना 95 टक्के रक्कम परत मिळणार आहे, असे आश्वासन आरबीआयने दिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरबीआय आणि केंद्रीय पातळीवरील …

Read More »

पनवेलमध्ये राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप वैद्यकीय सेलच्या वतीने देशभरात ‘राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा’ 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान आयोजीथ करण्यात येत आहे. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगडच्या वतीने या कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत भाजप …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी वाढता पाठींबा

माणगावात आगरी समाजाकडून नायब तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी समाज माणगाव विभाग शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून माणगाव तालुका निवासी नायब तहसीलदार भाबड यांना निवेदन देण्यात आले. दि. बा. पाटील यांनी आपले सर्व आयुष्य सामाजिक कार्यासाठी …

Read More »

नवी मुंबई विमानतळ ‘काम बंद आदोलन’ तूर्त स्थगित

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कृती समितीची घोषणा पनवेल : प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर सोमवार (दि. 16 ऑगस्ट) पासून सुरू होणारे नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेतेदि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती …

Read More »

स्वातंत्र्य दिनी करू या आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प!

देशात राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र असलो पाहिजे, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. ती फलद्रूप होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे अपरिहार्य आहे. आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या या साडेसात दशकांत राजकीय आणि सामाजिक …

Read More »

पेण, कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; ठेव विमा कायद्यातील बदलाचा लाभ अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स कायद्यात केलेल्या बदलमुळे बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ठेव विमा योजनेंतर्गत एक लाखांची मर्यादा वाढवून आता पाच लाखांची करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी बँक बुडाली तरी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंच्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर ’पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा’ या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलमधील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यातील एक प्रतिष्ठीत व्यापारी चंद्रकांत रिखबदास चोरडीया यांनी त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी नवीन कोरे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस व गाऊन मदत म्हणून दिले आहे. शहरातील व्यापारी चंद्रकांत चोरडीया यांचा व्यापार कमी …

Read More »

खारघरमधील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी

नगरसेविका नेत्रा पाटील यांचे सिडकोला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर विभागातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खारघर प्रभाग 4 मधील पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून मागील दोन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित आहे. सिडको प्रशासनाने याबाबत गांभीर्य दाखवून येथील पाणी समस्या तातडीने सोडवावी. या …

Read More »

सायबर गुन्हेगारांच्या आमिषांना बळी पडू नका

पोलिसांचे नागरिकांना आवाहन पनवेल : वार्ताहर सायबर गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. यासाठी नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास सोनवणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.त्यांनी सांगितले की, आमिषे, बक्षिसे यांना भुलणारे नेहमी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अशा अमिषांपासून पासून दूर राहिले पाहिजे. सगळ्याच मोठ्या …

Read More »