Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

कोरोना नियंत्रणासाठी सरकार कार्यरत; जुलै 2021पर्यंत 25 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार 24 तास काम करीत असून, जुलै 2021पर्यंत देशातील 25 कोटी लोकांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी (दि. 4) दिली. ते संडे संवाद या कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण जगात कोरोनाचे संकट वाढत असताना यावरील …

Read More »

…तर चीनला धडा शिकविण्यासाठी भारतीय लष्कर तयार

नवी दिल्ली ः गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून भारतीय सीमेवर सातत्याने आगळीक केली जात असून, घुसखोरी करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले असले तरी सीमेवरील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत, मात्र त्यातून काहीही तोडगा निघत नाही. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचे उद्घाटन

रोहतांग ः वृत्तसंस्थाजगातील सर्वाधिक उंचीवर असणार्‍या सर्वांत मोठ्या अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, तर हिमालच प्रदेशातील कोट्यवधी लोकांचीही गेल्या कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली असल्याचे उद्गार काढले. पंतप्रधान …

Read More »

राहुल गांधी यांच्याकडून हाथरस घटनेचे राजकारण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्थाहाथरस गँगरेप प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शनिवारी (दि. 3) पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी …

Read More »

देशात कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या एक लाख पार

महाराष्ट्रात सर्वाधिक बळी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताने शनिवारी (दि. 3) कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा एक लाखांचा टप्पा ओलांडला, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 लाखांवर पोहोचली आहे. देशातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, राज्यात आतापर्यंत सुमारे 38 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील 2.67 टक्के इतका जास्त आहे. केंद्रीय …

Read More »

हाथरसच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीच ट्विट करीत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये …

Read More »

विरोधक ना शेतकर्‍यांसोबत आहेत, ना जवानांसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकृषी कायद्याला विरोध करणार्‍या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. केंद्र सरकार देशातील शेतकर्‍यांना अधिकार देत असतानादेखील ही मंडळी विरोध करू लागली आहेत. यापूर्वी विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. विरोधक ना …

Read More »

पावसाच्या परतीचा प्रवास झाला सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापावसाच्या परतीच्या प्रवासाला सोमवार (दि. 28)पासून सुरुवात झाली. राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा 11 दिवस उशिराने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास यंदा सुरू झाला, परंतु तो नेहमीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.राजस्थानच्या वायव्येस सलग पाच दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील …

Read More »

दिलासादायक! देशात 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी या महामारीवर मात करणार्‍यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांच्या भारतातील एकूण संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सोमवारी (दि. 28) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 74 हजार 893 रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. याचबरोबर देशभरात कोरोनावर मात करणार्‍यांची …

Read More »

कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब; विरोधकांची मागणी फेटाळली

नवी दिल्ली ः संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (दि. 27) मंजुरी दिली. पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांनी ही विधेयके  मागे घेण्याची मागणी केली होती, तर राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी विरोधकांनी केली होती, पण ही मागणी फेटाळून लावत राष्ट्रपतींनी …

Read More »