Breaking News

मुंबई – नवी मुंबई

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र तापणार!

मुंबई : प्रतिनिधी एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर एप्रिल महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, मागील दोन दिवस …

Read More »

एमपीएससीच्या नवी मुंबईतील सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या 87व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुनील …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या उन्नतीसाठी उपाययोजना करणार-मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठ मोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 24) विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी …

Read More »

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तलाव स्वच्छ करावा

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सध्या याची दूरवस्था झाली आहे. तलावाची स्वछता करून सुशोभीकरण करावे, भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर …

Read More »

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधिमंडळाला भेट

दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची जाणून घेतली माहिती मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. 20) महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास भेट दिली. या विद्यार्थ्यांनी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची …

Read More »

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. संपकरी कर्मचार्‍यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचे संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलेे. या संदर्भात माहिती देताना संपकरी कर्मचार्‍यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले …

Read More »

दुचाकी घसरल्यावर मागून येणार्‍या वाहनाच्या खाली येऊन तरुणाचा मृत्यू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ उड्डाणपूलावर शनिवारी साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात 19 वर्षीय अमन इर्शाद अन्सारी याचा मृत्यू झाला. दुचाकी घसरल्यावर मागून येणार्‍या अज्ञात वाहनाच्या खाली तो आला होता. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमन अन्सारी हा वातानुकूलित यंत्राच्या दुरुस्तीचे काम करत …

Read More »

ऐरोली काटई परिसर होणार सुरक्षित

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांधणार टेकडीलगत संरक्षक भिंत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऐरोली काटई नाक्यादरम्यानच्या टेकडीचा परिसर आणि ऐरोली काटई नाका उन्नत रस्त्यावरील प्रवास सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील टेकडीवरून भूस्खलन होण्याचा धोका असून हा धोका टाळण्यासाठी टेकडीलगत संरक्षक भिंत बांधण्यात …

Read More »

शेतकर्‍यांचा लाँग मार्च अखेर स्थगित

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार आणि शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची चर्चा होऊन तोडगा निघाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येत असलेला किसान लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तशी माहितीही दिली आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करीत असल्याची माहिती शेतकरी …

Read More »

सर्वसमावेशक अर्थसंकल्पाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन अन् आभार!

मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्याचा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी पनवेल, उरणसह रायगड जिल्ह्याला पुढील काळात आवश्यक असलेल्या बाबींचा उल्लेख करीत तशी मागणीही या वेळी केली. …

Read More »