मुंबई : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. 16) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. …
Read More »आनंदाचा शिधा उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी आनंदाचा शिधा उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरेतर खूप मोठे असून हा उपक्रम राबवताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद …
Read More »हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
नवी मुंबई : बातमीदार रेल्वेवरील रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर …
Read More »आवक वाढल्याने कांद्याचे भाव उतरले
नवी मुंबई : बातमीदार वाशीच्या बाजारात कांद्याची जादा आवक होत असून त्याप्रमाणात मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत. प्रतिकिलो 8-11 रुपयांवर विकला जाणारा कांदा 6 ते 9 रुपयांवर आलेला आहे. एपीएमसी बाजारात डिसेंबर, जानेवारीत नवीन कांद्याची अधिक आवक होत असते. या वेळी दर कमी होण्यास सुरुवात होते. आता बाजारात जुना …
Read More »लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन मुंबई : प्रतिनिधी पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती मिळून सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत 200पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. 6) केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना …
Read More »राज्यात नवे रेती धोरण
अनधिकृत उत्खननाला आळा बसून स्वस्त दराने रेती मिळणार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून बुधवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व …
Read More »सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती!
राज्य सरकारचा शेतकर्यांना दिलासा मुंबई : प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करून शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय बुधवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्यांना मदत देण्यात येईल. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली …
Read More »कोकणासह पश्चिम महाराष्ट्र तापणार!
मुंबई : प्रतिनिधी एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर एप्रिल महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, मागील दोन दिवस …
Read More »एमपीएससीच्या नवी मुंबईतील सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या 87व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या बेलापूर सीबीडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 1) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे, सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुनील …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या उन्नतीसाठी उपाययोजना करणार-मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठ मोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 24) विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper