Breaking News

मुंबई – नवी मुंबई

महागड्या औषधोपचारामुळे रुग्ण, नातेवाईक त्रस्त

कोरोना संकटात परवड नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्‍या लाखोंच्या बिलाने सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. अशातच एकूण उपचार खर्चात औषधांचाच सर्वाधिक भार दिसून येत आहे. त्यात कमी किमतीची पर्यायी औषधे उपलब्ध असतानाही, ज्यादा किमतीची औषधेच वापरली जात असल्याचेही दिसून येत आहे. मागील एक वर्षांपासून …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन वाढणार की संपणार?; आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता 4 एप्रिलपासून राज्य सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती, पण …

Read More »

लसीकरणावरून ‘मविआ’त वाद; काँग्रेस आमदाराचा शिवसेना मंत्र्याविरोधात संताप

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील लसीकरणावरून महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी तर शिवसेनेला आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का, असा सवाल केलाय. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि शिवसेनेत यांच्यातील वाद पुन्हा उभारून आला आहे. काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना नेते व …

Read More »

कोरोनामुळे बिघडतेय कौटुंबिक स्वास्थ्य

मानसिक तणाव, कलहाने वाढले तंटे; पोलिसांत वादाच्या शेकडो तक्रारी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे आजारपणाव्यतिरिक्त लॉकडाऊन, आर्थिक अडचणी यांमुळे मानसिक स्वास्थ्यात बदल होत आहे. शुल्लक कारणांवरून लगेच राग येणे, चिडचिड यात वाढ होत आहे. लॉकडाऊन काळात सतत घरात असल्याने घरातल्या व्यक्तींबरोबर अनेक वाद होतात, परिणामी वाद टोकाला जाऊन अनेकांना …

Read More »

सिंधुदुर्गात आजपासून होणार कडक लॉकडाऊन

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग होत असल्याचे आढळून आले असून त्याची गंभीर दखल घेत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनची घोषणा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार 9 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 15 मे रोजी …

Read More »

आघाडी सरकारने कोकणाला वार्यावर सोडलंय -प्रसाद लाड

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी आघाडी सरकारने कोकणाला वार्‍यावर सोडलंय, असे म्हणत निशाणा साधला आहे.  भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोकणाने आजवर शिवसेनेला …

Read More »

मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, यावरून राज्य सरकार मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

सिडकोकडून मेट्रोची यशस्वी चाचणी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोकडून शुक्रवारी (दि. 7) आगार प्रवेश छन्नमार्गावर आणि तळोजा आगारातील चाचणी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात येऊन, ही चाचणी यशस्वीरीत्या झाली. या वेळी एकूण 850 मीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावली. सुरक्षिततेच्या कारणास्तव मेट्रोचा वेग कमी ठेवून तो 65 कि.मी. प्रती तास इतका राखण्यात आला. या प्रसंगी …

Read More »

‘मविआ’त ऑल इज नॉट वेल!; काँग्रेस आमदार जिशान सिद्धकींचा मंत्री परबांवर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे चांगलेच संतापले आहेत. सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप सुद्धा केले …

Read More »

नियोजित पक्षी अभयारण्याबाबत राज्य सरकारचे उदासीन धोरण; तातडीने कार्यवाहीची पर्यावरणप्रेमींकडून मागणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ एनआरआय येथील पाणथळची जागा पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले होते, परंतु सध्याच्या आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून एनआरआयसह पांजे-फुंडे येथील …

Read More »