Breaking News

मुंबई – नवी मुंबई

केंद्राच्या बदनामीलाच ठाकरे सरकारचे प्राधान्य; भाजपच्या आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी जनहिताच्या निर्णयांच्या बाबतीत भाजप नेहमीच राज्यातील सरकारच्या सोबत आहे, पण दुर्दैवाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेते. पंतप्रधान मोदींचा मत्सर आणि केंद्र सरकारची बदनामी याच निकषांवर राज्य सरकारचा कारभार सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. मुंबईत घेतलेल्या …

Read More »

‘मविआ’ला मराठा आरक्षण द्यायचेच नव्हते; भाजप नेते खासदार नारायण राणेंचे टीकास्त्र

मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची या संदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 12) भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असा …

Read More »

संसर्ग घटतोय, मात्र मृत्यूदर वाढतोय!; नवी मुंबईत कोरोनाबाबत किंचित दिलासा आणि चिंताही

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कडक संचारबंदीनंतर नवी मुंबईतील कोरोना रुग्णवाढ घटली असून दैनंदिन 1441 पर्यंत गेलेली बाधितांची संख्या आता शंभर ते दोनशेच्या घरात आली आहे. त्यामुळे 15 टक्क्यांवर पोहचलेला कोरोना लागण दर आता पाच टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, हे शहरासाठी दिलासादायक चित्र आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची …

Read More »

राज्यात ’म्युकरमायकोसिस’चे 2000 रुग्ण

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना सध्या एका नव्याच आजाराचा सामना करावा लागत असून या आजारामुळे डोळे व मेंदूवर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. या आजाराने आता राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ’म्युकरमायकोसिस’ असे या गंभीर आजाराचे नाव आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात …

Read More »

राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ?

हवामान खात्याची माहिती; मच्छीमारांना किनार्‍यावर परतण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे, तर काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. आता राज्यात एक नवे संकट उभे ठाकले आहे. येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. त्यामुळे अरबी …

Read More »

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा

भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली असून, सीबीआयनंतर आता सक्तवसुली संचलनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात …

Read More »

ठाकरे सरकार वसुलीत मग्न

आ. अतुल भातखळकरांची टीका मुंबई ः वृत्तसंस्था कोरोनाच्या आणीबाणीत राज्यात लसनिर्मितीसाठी तातडीने हालचाली करून बायोवेट कंपनीला आवश्यक त्या परवानग्या देणे शक्य होते, परंतु ठाकरे सरकार वर्षभर वसुलीत मग्न असल्यामुळे परवानगी लोंबकळली. अखेर हायकोर्टाला त्यात लक्ष घालावे लागले. तुमची लस न्यायालयाची जबाबदारी, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर …

Read More »

ज्येष्ठांचे गृहविलगीकरण कमी

महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आता थोडासा का होईना दिलासा मिळत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी आता गृहविलगीकरणाचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. सद्य:स्थितीमध्ये 1,424 जण घरी उपचार घेत असून, त्यामध्ये पन्नाशीच्या पुढील 337 जणांचा समावेश आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी 50 वर्षांवरील रुग्णांनी …

Read More »

बांधकाम क्षेत्राला सिडको देणार एनओसी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2020  (युडीपीसीआर 2020) नुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याकरिता नवी मुंबई क्षेत्रातील बांधकामांसाठी अंतरिम ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. यामुळे संबंधित भाडेपट्टाधारकांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकासह स्थानिक प्राधिकरणांकडून बांधकाम परवाना मिळवणे शक्य होणार …

Read More »

फळे, भाज्या निर्यातीला निर्बंधांचा फटका

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उन्हाळ्यात फळांचा हंगाम असतो. या फळांना जशी देशात मागणी असते तशीच विदेशातही असते. त्यामुळे या काळात फळांच्या बाजारातही तेजीचे वातावरण पाहायला मिळते, परंतु यंदा वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि कडक निर्बंध यांमुळे फळांसह भाज्यांची आयात-निर्यात थांबली. सध्या भाज्यांसह फळांची निर्यात सुरू असली तरी लॉकडाऊनचा 30 ते …

Read More »