Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 लाख पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवा’

ठाणे : प्रतिनिधी नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते सामाजिक संघटना प्रकल्पग्रस्त शेतकरी जनता गेली काही वर्षे मागणी करीत आहेत, त्यासाठी त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहारही केला आहे. आता ही मागणी लावून धरण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, …

Read More »

कोरोनाचा धोका अद्याप कायम; काळजी घेण्याचे नवी मुंबई मनपाकडून आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका अद्याप संपलेला नसून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच …

Read More »

सिडकोतर्फे 106 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाकडून नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली नोडमधील 106 इतक्या मोठ्या प्रमाणावर निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे भूखंड हे बंगलो, रो-हाऊस आणि निवासी इमारतींकरिता उपलब्ध आहेत. यामुळे नवी मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे बंगला, रो-हाऊस बांधू इच्छिणारे नागरिक आणि …

Read More »

गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का?

भाजप नेते आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल मुंबई : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. माघी गणेशोत्सवासाला केवळ पाच दिवस बाकी असताना नऊ फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात गणेशमूर्तीची उंची चार …

Read More »

राज्यपालांना विमान प्रवास नाकारला

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाचा नवा अंक गुरुवारी (दि. 11) समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते, मात्र राज्यपालांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास ठाकरे सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरून खासगी …

Read More »

मुंबई मॅरेथॉन 30 मे रोजी

मुंबई : प्रतिनिधीजानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात रंगणारी टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा 30 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोरोनामुळे या शर्यतीच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.या संदर्भात संयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलने पत्रकात म्हटले आहे की, सावधगिरीने पावले टाकत सर्वांशी चर्चा करून मोठ्या आशेने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय …

Read More »

महाविकास आघाडीत धुसफूस

शिवसेना नेत्यांची नवी मुंबईत स्वबळाची मागणी नवी मुंबई : खास प्रतिनिधीमहाविकास आघाडीने आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्यस्तरीय नेत्यांनी आघाडी करून लढण्याचे आदेश दिले असले तरीही स्थानिक पातळीवर आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. अशातच नवी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी …

Read More »

‘भारतरत्नांची चौकशी करणारे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत’

मुंबई : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणार्‍या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्विट करणार्‍या भारतातील सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात …

Read More »

काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का?

भाजप नेते आशिष शेलारांचा सवालवजा टोला मुंबई : प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा टोलाही त्यांनी लगावला. शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. …

Read More »

देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा -चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही. देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा झाली आहे. असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर केला आहे. शेतकरी …

Read More »