Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आई जरीमरी अकॅडमीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात बंद असलेले उद्योग व्यवसाय आत्ता पुर्व पदावर आले आहे. त्यापर्श्वभुमीवर दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर सुप्रसिद्ध गायक गणेश भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी  ‘आई जरीमरी अकॅडमी’ सुरू केली आहे. या अकॅडमीचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी आई …

Read More »

‘मविआ’च्या निष्काळजीपणामुळे कोळसा टंचाई

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्रालयाचा निष्काळजीपणा वीज प्रकल्पांमध्ये कोळशाच्या कमतरतेला कारणीभूत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली, असे अहिर म्हणाले. तसेच सरकारने महाजेन्को (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी)ने …

Read More »

प्रेषिता तरेची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेसाठी निवड

पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी बेणसे येथील प्रेषिता दत्ताराम तरे हिची निवड झाली आहे. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुणे डेक्कन जिमखाना जलतरण तलावात खुली निवड चाचणी घेण्यात …

Read More »

नवी मुंबईत दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेमार्फत देवी विसर्जनासाठी सुसज्ज ठेवण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख होता. त्यामुळे सर्वच 22 मुख्य विसर्जनस्थळांवर घरगुती घट आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्रीदुर्गामूर्ती अशा 864 दुर्गादेवींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने झाले. सर्वच 22 विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरेकेटींग …

Read More »

पनवेलच्या शेतात बासमती तांदूळ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामधील गुळसुंदे गावातील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी साडेतीन गुंठे क्षेत्रात बासमती तांदळाचे यशस्वी उत्पन्न मिळविले आहे. नुकताच कृषिभूषण पुरस्कार मिळालेले मिनेश गाडगीळ यांना शेतीक्षेत्रात विविध प्रयोग करण्याची आवड आहे. शेतकर्‍यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पीक लागवड केल्यास पिकाचे उत्पन्न वाढते. पारंपारिक पद्धत बाजुला …

Read More »

नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी खेचून ते पसार झाले आहेत. या घटनांमुळे सध्या महिला वर्गात भितीयुक्त वातावरण आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 येथील जनता किराणा स्टोअर्स येथे एक 15 वर्षीय मुलगी जात असताना तिला पाठीमागून एका व्यक्तीने जोराचा धक्का …

Read More »

गव्हाणफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार

चिरनेर महामार्गावर उड्डाणपूल उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हिरवा कंदील उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल महामार्गावर गव्हाणफाटा हे वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले असून, नागरिकांसह वाहनचालक व येथील व्यवसायिक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळे आत्ता या वाहतूक कोंडीवर उड्डाणपुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. त्यामुळे चिरनेर परिसराकडे जाणार्‍या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने …

Read More »

ऋतुराजचे पुण्यात जल्लोषात स्वागत

पुणे ः प्रतिनिधी आयपीएल 2021 स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मने जिंकली. ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याचे रविवारी (दि. 17) पुण्यात आगमन झाले. या वेळी पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करीत त्याचे जल्लोषात स्वागत केले. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या 16 सामन्यांत 635 धावा केल्या आहेत. यात एक …

Read More »

‘सॅफ’चे भारताला आठव्यांदा विजेतेपद

माले ः वृत्तसंस्था भारतीय संघाने दबदबा कायम राखताना तब्बल आठव्यांदा ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर 3-0 अशी मात करीत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनात पहिलेच जेतेपद पटकावले. नेपाळविरुद्धचे मागील तीनपैकी दोन सामने जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे …

Read More »

प्रदीर्घ संघर्षांनंतर मिळविलेले यश रोमहर्षक -आमदार प्रशांत ठाकूर; रोठ बुद्रकमध्ये ग्रामसचिवालयाचे उद्घाटन, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

धाटाव ः प्रतिनिधी रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर मिळविलेले यश हे रोमहर्षक असल्याचे त्यांच्या भावनेतून दिसून येते. या यशासाठी त्यांनी 25 वर्षे त्यांच्या विरोधकांविरुद्ध लढा दिला. हे करीत असताना त्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. प्रसंगी गुन्हे दाखल होऊन तुरूंगात जावे लागले, मात्र …

Read More »