अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या छताला गळती लागली आहे. त्यातून वरच्या मजल्यावरील दूषित पाणी ठिबकत आहे. छताला बुरशी आली आहे. अशा प्रदूषित वातावरणातच रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीवर …
Read More »रणधुमाळीची चाहूल
कोरोनाच्या तिसर्या लाटेची प्रतीक्षा एकीकडे सुरू असताना दुसर्या बाजूला राज्यात राजकीय पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आणखी सहा महिन्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऐन भरात आलेली असेल. त्या रणधुमाळीची चाहूल आतापासूनच लागू लागली आहे. तिसर्या लाटेचा प्रभाव आणि भीती जसजशी ओसरेल तसतसे पालिका निवडणुकांचे युद्ध पेटत जाईल अशी चिन्हे …
Read More »पेण बाजारपेठ राख्यांनी सजली; वेळेत वाढ झाल्याने दुकानदार आनंदित
पेण : प्रतिनिधी रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारा पवित्र सण येत्या रविवारी (दि. 22) म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी पेणच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या रंगेबेरंगी निरनिराळ्या आकाराच्या झगमगणार्या राख्या आल्या असून, पेणच्या बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. या राख्यांच्या खरेदीसाठी महिला, तरुणी गर्दी करत असून डायमंड लाईट राख्यांना …
Read More »भाजीमार्केटच्या पहिल्या मजल्यावरील गाळे रिकामे; मुरूड नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला
मुरूड : प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महावीर भाजी मार्केटचे पहिल्या मजल्यावरील गाळे भाडेतत्त्वावर न दिल्याने मुरूड नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या बहुउद्देशीय इमारतीचा उपयोग मात्र फक्त भाजी विक्रेत्यांसाठीच होत असल्याने नगर परिषदेचा मोठा तोटा होत आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून मुरूड नगर परिषदेने 2014-15 मध्ये महावीर भाजीमार्केट बांधले …
Read More »अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे पनवेल महापालिकेकडून लसीकरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंथरूणाला खिळून असणार्या नागरिकांच्या कोविड लसीकरणास काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. आजवर पालिका क्षेत्रातील 27 नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. अशा रुग्णांच्या लसीकरणासाठी संबधितांनी नजिकच्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. अनेक कुटूंबामध्ये …
Read More »खालापूर दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज ठप्प; इंटरनेट नसल्याचा बहाणा
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यात सध्या जमीन आणि सदनिका खरेदी विक्रीचे व्यवहार तेजीत आहेत, मात्र इंटरनेट सेवा नसल्याकारणाने खालापूर दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. सदनिका, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी बंद असल्याने नागरिक व सदनिकाधारकांना मोठ्या समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तसेच शासनाचा …
Read More »एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. एकनाथ खडसेंच्या मुलीनंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. त्यानुसार त्यांना बुधवारी (दि. 18) ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा …
Read More »पोश्री नदीवरील चाफेवाडी येथील पूल धोकादायक
कर्जत : बातमीदार तालुक्यातील चाफेवाडी येथे पोश्री नदीवर बांधण्यात आलेला पूल धोकादायक झाला आहे. या भागातील रस्तेसुद्धा खड्डेमय झाले आहेत. खांडस-नांदगाव रस्त्यावरील चाफेवाडी येथे 25 वर्षांपूर्वी पोश्री नदीवर पूल बांधण्यात आला होता. या पुलाची अवस्था सध्या खूपच खराब झाली आहे. पुलावर डांबर राहिले नाही आणि मोठे खड्डे पडून पुलाच्या लोखंडी …
Read More »ना. कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नवी मुंबईत जोरदार स्वागत
नवी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पावलांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपने सुरू करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मंगळवारी नवी मुंबईत आगमन झाले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ, पामबीच मार्गावर आगमन झालेल्या या जनआशीर्वाद यात्रेचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जंगी …
Read More »‘व्हीके’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा पनवेल : प्रतिनिधी शहरातील व्ही. के. हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे बारावीच्या 200 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून शाळेने जबाबदारी झटकली. भाजप युवा मोर्चाचे (भाजयुमो) अध्यक्ष मयूरेश नेतकर यांनी 20 ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. व्हीके हायस्कूलने बारावीच्या पूर्व परीक्षेचे मार्क आम्ही धरणार नाही. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper