Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगड जि. प. पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार; सभापती दिलीप भोईर यांचा घरचा आहेर

अलिबाग : प्रतिनिधी रेवस पंचक्रोशीतील गावांना प्राधान्याने पाणी गेले पाहिजे, मात्र तेथील बोअरवेलला, विहिरींना मचूळ पाणी आहे. त्या गावकर्‍यांना एमआयडीसीचाच आधार आहे, पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराने ते मिळणार नाही, असा दावा पत्रकार परिषदेत करून समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी घरचा आहेर दिला आहे. रेवस, कोप्रोली, मिळखतखार, सारळ …

Read More »

जिल्हा प्रशासनाची आपत्तीशी यशस्वी झुंज!

अतिवृष्टीमुळे 22 जुलैच्या रात्री महाड शहरात पूर आला. त्या मागोमाग पोलादपूर तालुक्यातील देवनाळे व साखर सुतारवाडी आणि महाडमधील तळीये या गावी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. अतिमुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर येऊन महाड शहर, बिरवाडी, राजेवाडी, लाडवली, गांधारे पाले, बिरवाडी एमआयडीसी, दादली पूल, पोलादपूर तालुक्यातील माटवण, आकले, कालवली, केवनाळे, साखर सुतारवाडी …

Read More »

डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते राऊत क्लिनिकचे उद्घाटन

उरण, चिरनेर : प्रतिनिधी पी. पी. खारपाटील एज्युकेशनच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरदास राऊत यांचे सुपुत्र डॉ. व्हॅन्युज सुरदास राऊत यांनी सुरू केलेल्या राऊत क्लिनिकचे उद्घाटन पनवेल येथील डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते नुकतेच चिरनेर येथे करण्यात आले. दिवसेंदिवस बदलणार्‍या वातावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आजाराचे …

Read More »

हनीट्रॅपमध्ये अडकवून बांधकाम व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीने पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे. हनीट्रॅप म्हणजे आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याची गुप्त माहिती किंवा त्याच्याकडून पैसे उकळणे होय. …

Read More »

ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेसाठी आले असता आगरी कोळी समाज हॉलमध्ये ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींची जनगणना 2021मध्ये होणार असे जाहीर केले होते, परंतु कोविंड या महामारी मुळे ते चालू करता …

Read More »

नवी मुंबई कोविड लसीकरण वेगात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरणाला वेग देताना कोणताही समाजघटक दुर्लक्षित राहू नये याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येत असून बेघर निराधार नागरिक, तृतीयपंथी व्यक्तींचे तसेच रेड लाईट एरिया, कॉरी क्षेत्र अशा काहीशा दुर्लक्षित भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील विविध वृध्दाश्रमांमधील वयोवृध्द …

Read More »

विवेक पाटील यांची 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

‘ईडी’चा दणका मुंबई ः प्रतिनिधीकोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मोठा दणका बसला आहे. विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनेक अन्य …

Read More »

दारूच्या दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का?; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल

पंढरपूर ः प्रतिनिधीजेवढी गर्दी बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) पंढरपूर येथे केली. माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत …

Read More »

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर बिस्कीटचा टेम्पो उलटला

कर्जत : बातमीदार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कर्जत- कल्याण राज्यमार्गावरील आषाणे गावाजवळ सोमवारी (दि. 16) पारले बिस्किटांचा टेम्पो उलटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पारले कंपनीचे बिस्किटे भरलेला टेम्पो सोमवारी कर्जतहून कल्याणच्या दिशेने जात होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आषाणे गावाजवळ असलेल्या वळणावर …

Read More »

18000 फूट उंचीवर लोकनेते दि. बा. पाटील यांचा जयजयकार

नेरळ, बदलापूरमधील तरुणांनी झळकावला फलक कर्जत : बातमीदार नेरळ आणि बदलापूर अभियंते असलेल्या सहा तरुणांनी लेह लडाखला जाऊन समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर असलेल्या खरडुंगला पास येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा जयजयकार केला. तेथे या तरुणांनी तिरंगा झेंडा फडकवत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या …

Read More »