Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णसंख्येत घट; कोरोना दरही होतोय कमी!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांत घट झाली असून गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या स्थिर असल्याने बाधितांचा दरही कमी झाला आहे. कोरोनाचा उपचार घेत …

Read More »

मंत्रालय की मद्यालय?

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आणखी किती वेळा पहावा लागणार आहे, कोण जाणे? ज्या ठिकाणाहून अकरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या कारभाराची मंत्रणा होेते, त्या मंत्रालयाच्या प्रांगणात दारुच्या बाटल्या सापडायला लागल्या आहेत. हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यकर्त्यांनी त्याबद्दल दाखवलेली अनास्था आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. मंत्रालय हे लोकशाहीचे पवित्र मंदिर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

संकल्प फाऊंडेशन व संस्कार अ‍ॅक्टिविटी सेंटर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात पनवेल : प्रतिनिधी संकल्प फाऊंडेशन व संस्कार अ‍ॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविण्यात आला. गेल्या आठवड्यात महाड परिसरात महापुराने सगळेच उद्ध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, …

Read More »

कामगार नेते जितेंद्र घरत यांचा वाढदिवस साजरा

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण उरण : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते जतेंद्र घरत यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त त्यांना उरणचे आमदार महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इंडियन ऑईलटॅकिंग लिमिटेड नवघरच्या …

Read More »

दुकाने सुरळीत ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

कामोठे ः प्रतिनिधी सलग दोन वर्षे व्यापारी, दुकानदार हे लॉकडाऊन, निर्बंधांमुळे परेशान झाले असून दुकानाचे भाडे, लाईट बिल, कर्ज, खर्च यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून 11 ऑगस्टपासून दुकाने दररोज सुरळीत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कामोठे शहर व्यापारी महामंडळ असोसिएशनने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश …

Read More »

पनवेल तालुक्यात विविध विकासकामे

वाकडी येथे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत वाकडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) उद्घाटन करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वाकडी …

Read More »

श्रीवर्धनमध्ये सापडला 22 किलोंचा घोळ मासा

दोन लाख 61 हजारांत विक्री अलिबाग ः प्रतिनिधीश्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात 22 किलो वजनाचा घोळ मासा सापडला. या माश्याची लिलावात तब्बल दोन लाख 61 हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यामुळे हा मासा पकडणारे मच्छीमार चांगलेच मालामाल झाले आहेत.जीवना बंदरावरील मच्छीमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत …

Read More »

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी

पोलादपूर ः प्रतिनिधीपुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. कोकण …

Read More »

मशाल मोर्चाचा सर्वत्र एल्गार

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 9) उरण तालुक्यातील जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. तेथे मुख्य मशालीने प्रज्वलित करण्यात आलेल्या मशाली सायंकाळी रायगड जिल्ह्यासह …

Read More »

अकरावीची सीईटी रद्द

उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका मुंबई : प्रतिनिधीइयत्ता अकरावीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले आहे. हा निर्णय म्हणजे सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. इयत्ता दहावीच्या …

Read More »