Breaking News

महत्वाच्या बातम्या

सामाजिक बहिष्कारात रायगड राज्यात दुसर्‍या क्रमांकावर

पाली : प्रतिनिधी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्या अंतर्गत राज्यात आतापर्यंत एकशेचार गुन्हे दाखल झाले असून यात रायगड जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोकणात काही बाबतीत आजही जुन्या …

Read More »

कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणे होणार जमीनदोस्त; नारीशक्ती संघटनेसमोर प्रशासन नरमले

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत संबंधित खात्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर नारीशक्ती संघटनेने तिसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 1) रात्री आपले आमरण उपोषण स्थगित केले. कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावरील चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हॉटेल, गॅरेज आदी दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या …

Read More »

कोरोनामुळे मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला घरघर

कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध जारी ठेवले असून कोरोनाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे मुरुडसारख्या निसर्गरम्य व ऐतिहासिक स्थळाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने एरव्ही सदैव गजबज असलेल्या तालुक्यातील बीचवर गेल्या काही महिन्यांपासून शुकशुकाट दिसून येत आहे. त्याचा पर्यटनावरच अवलंबून असलेल्या स्थानिक हॉटेल, लॉजिंग व छोट्याछोट्या व्यवसायिकांवर मोठा …

Read More »

नियमांचे उल्लंघन करून देवकुंडला पर्यटकांची गर्दी

माणगाव : प्रतिनिधी पाटणूस ग्रामपंचायतीचे हद्दीतील देवकुंड धबधबा निसर्ग प्रेमींसाठी खळखळून वाहत आहे. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र तसेच विविध भागातून पर्यटक भिरा, येथील देवकुंडाला पर्यटनासाठी येतात. गेल्या चार वर्षांपूर्वी याच देवकुंडात अनेक पर्यटक बुडाल्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे तेथे प्रशासनाने निर्बंध लादण्यात आलेले आहे. तरीही अनेक पर्यटक तसेच वर्षासहलीसाठी निसर्गप्रेमी …

Read More »

‘पावसाळी अधिवेशनावेळी विविध मागण्यांसाठी निदर्शने करणार’

मुंबई : प्रतिनिधी पदोन्नतीमधील आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी येत्या 6 जुलै रोजी आझाद मैदानात निदर्शने आंदोलन करणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष …

Read More »

महाविकास आघाडीत विसंवाद -दरेकर

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी विस्कळीत होत असल्याने संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाभारताचे दाखले द्यावे लागत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूसफूस, विसंवाद असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आघाडी करण्यामध्ये संजय राऊतांची महत्त्वाची भूमिका होती. आता …

Read More »

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात तीन जण ठार

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी हद्दीत गुरुवारी (दि. 1) चार वाहनांचा भीषण अपघात घडला. यात एक कार पूर्णपणे जळून खाक होऊन त्यातील तिघांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला.आडोशी हद्दीतील तीव्र उतारावर एका कंटेनरने आय 10 कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती कार पुढील पुढील ट्रकवर धडकली व तिने पेट …

Read More »

संभ्रम नाट्य सुरूच

महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये पदांच्या वाटपावरून अंतर्गत धुसफूस असतेच. विधानसभाध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्या पदावर काँग्रेसचाच नेता बसणार हे उघड असले तरी या बाबतीत होणारे राजकारण थांबायला तयार नाही. खुद्द काँग्रेस पक्षातच विधानसभाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव सुचवायचे यावरून अद्यापही एकमत झालेले दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर …

Read More »

संत तुकाराम, एकनाथ महाराजांच्या पालख्यांचे प्रातिनिधिक प्रस्थान

देहू, पैठण ः प्रतिनिधीआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि पैठणमधून संत एकनाथ महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी (दि. 1) प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान झाले. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी कायम असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा झाला, तर आळंदी येथून शुक्रवारी ज्ञानोबा माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे.यंदाही …

Read More »

फार्मा पार्क प्रकल्पाबाबत राज्य शासनाची भूमिका दुटप्पी

अ‍ॅड. महेश मोहिते यांचा आरोपराज्यपालांना भेटून भूमिका मांडणार अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प येणार नाही असे राज्य शासन सांगते. त्याचवेळेस स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य शासन या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेऊन स्थानिक शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे, असा …

Read More »