Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरणकरांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणात जून अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे, मात्र पाऊस लांबणीवर पडल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून 3 मेच्या लॉकडाऊननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उपअभियंता रंजित …

Read More »

शिधावाटप दुकाने बंद ठेवणार्यांवर कारवाई

शिधावाटप उपनियंत्रकांचे आदेश; परवाने होणार रद्द पनवेल ः बातमीदार नवी मुंबईमधील ऐरोली, दिघा ते बेलापूरपर्यंत पसरलेल्या शिधावाटप दुकानदारांनी 1 मेपासून मोफत अन्नधान्य वाटप करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. नियमित धान्यवाटप झाले की शिधावाटप दुकाने बंद केली जातील, असेही स्पष्ट केले आहे. या आशयाचे पत्र मुख्य शिधावाटप अधिकार्‍यांना दिले आहे. दुकानदारांच्या …

Read More »

रिसॉर्टमध्ये घेतले भाजीपाल्याचे पीक

कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या संकटामुळे रिसॉर्टमधील बुकिंग रद्द झाले आहे. स्थानिक फार्म हाऊस मालक आता त्या ठिकाणी भाजीपाला पिकवत आहेत.  कर्जत तालुक्यातील पोसरी गावात राहणारे शेतकरी आणि शेतीच्या माध्यमातून उद्योजक क्षेत्रात उतरलेले अनिल प्रभाकर कडू यांनी आपल्या लाडीवली येथील वसंत रिसॉर्टमध्ये भाजीपाला लागवड करून उत्पादन घेतले आहे. प्रभाकर …

Read More »

पालिका कर्मचार्यांची रोह्यात आरोग्य तपासणी

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहे अष्टमी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार व ठेकेदार याकडे असलेले कामगार नेटाने कार्यरत आहेत. निगराणी, फवारणी, स्वच्छतेचे काम ही मंडळी करीत असल्याने  या सर्वांची आरोग्य तपासणी पालिकेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय व खासगी डॉक्टर यांच्या सहकार्याने करण्या येत आहे.  शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात …

Read More »

पोल्ट्री व्यवसाय पुन्हा रूळावर

पेण : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकन खाणे अपायकारक असल्याच्या अफवा मागील काळात सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. यानंतर सरकार तसेच आरोग्य यंत्रणांकडून चिकन, अंडी खाणे आरोग्यास अपायकारक नसल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर झाला. त्यानंतर पोल्ट्री व्यावसायिक आपला व्यवसाय नव्या …

Read More »

खान्देश रहिवासी सेवा संघातर्फे रिक्षाचालक-मालकांना मदत

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली खान्देश रहिवासी सेवा संघाकडून येथील रिक्षाचालक-मालक संघटनेच्या 35 गरजू सभासदांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यासाठी सेवा संघाच्या सदस्यांकडून विशेष निधी जमा करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी अनेक रिक्षाचालक व मालकांना आर्थिक व दैनंदिन गरजू साहित्य खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्या …

Read More »

रोजच्या चुकीच्या सवयींमुळे निर्माण होतात गंभीर समस्या

दैनंदिन जीवन जगत असताना आरोग्याच्या अनेक लहानमोठ्या कुरुबुरी उद्भवत असतात. सायटिका एक स्थिती आहे ज्यात नसांना सूज येणं, वेदना होणं अशा समस्या निर्माण होत असतात. सायटिका या आजारात पाठदुखीची समस्या जाणवते. या वेदनेमुळे संपूर्ण अंगदुखीची समस्यासुद्धा उद्भवू शकते. वेळीच लक्ष न दिल्यास त्रास वाढत जाऊ शकतो . रोजचं जीवन जगत …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात विजेचा लपंडाव

श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असून, संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीयेत. अशा वेळी महावितरणने वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे, मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित का होतो याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. …

Read More »

सरसगड किल्ल्यावरील वणवा धाडसाने विझविला

पालीतील दोन तरुणांचा पराक्रम पाली : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील डोंगर रानावनात, जंगलभागात सातत्याने वणवे लागण्याच्या घटना समोर येतात. यामध्ये वनसंपदा व जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होते. अशाच प्रकारे सरसगड किल्ल्यावर वणवा लागला होता. हा वणवा अधिक पसरला असता तर कदाचित मानवी वस्तीजवळ पोहोचला असता तसेच वृक्षराजी आणि पशू-पक्ष्यांचीदेखील हानी झाली …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

17 गावे आणि 59 वाड्यांना टँकरची प्रतीक्षा कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुका पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करून तालुक्यातील 17 गावे आणि 59 वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत, मात्र या कृती समितीचे काम कोरोनामुळे …

Read More »