पुणे : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक व्यवहार बंद ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. याचा विविध घटकांना फटका बसत असताना विवाह सोहळेदेखील यातून सुटले नाहीत. पुण्यात अशाच एका विवाहसोहळ्याला कार्यस्थळ शोधताना कुंजीर कुटुंबाची अक्षरश: धांदल उडाली आणि अखेर विवाहसोहळा घराच्या टेरेसवर उरकण्यात आला. पुण्यात घोरपडी …
Read More »रायगडकरांनी घंटानाद करून व्यक्त केली कृतज्ञता
अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला रायगडकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. संपूर्ण जिल्ह्यात सन्नाटा होता. एरवी गजबजणारे रस्ते, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे सारे काही सुने सुने होते. एसटी बसेसच काय पण खासगी वाहनेदेखील रस्त्यांवरून धावत नव्हती. जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात …
Read More »होम क्वारंटाईनचा नियम मोडणार्यांवर श्रीवर्धनमध्ये कारवाई
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त श्रीवर्धनच्या खारशेत भावे गावातील तिघे होम क्वारंटाईन असतानाही बाहेर रस्त्यावर फिरत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात असून, परदेशातून आलेल्यांना स्वत:हून क्वारंटाईन होण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. श्रीवर्धनमध्ये हे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार …
Read More »रायगड जिल्ह्यात 609 जणांचे अलगीकरण
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या नागरिकांची संख्या 740वर पोहोचली असून त्यापैकी 130 जणांचा 14 दिवसांचा निगराणी कालावधी पूर्ण झाला आहे. 521 जणांचे घरातच अलगीकरण केले आहे, तर 88 लोक शासकीय अलगीकरण केंद्रात दाखल आहेत. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात एक नागरिक दाखल आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचे …
Read More »राज्यात कोरोनाचा दुसरा बळी; मुंबईत रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात या विषाणूची लागण झाल्यामुळे दुसरा बळी गेला आहे. 56 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या बळींची राज्यातील संख्या दोन झाली, तर देशातील मृतांचा आकडा सातवर गेला आहे. मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या संबंधित व्यक्तीला 19 मार्च रोजी …
Read More »प्रकाश नायक यांच्याकडून पोलिसांना अल्पोपाहार
अलिबाग : प्रतिनिधी जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार बंद होते. अशावेली बंदोबस्तासाठी रस्त्यावर फिरणार्या पोलिसांसाठी अलिबागेतील स्टार लॉटरी सेंटरचे मालक प्रकाश नायक यांनी पाणी, चहा, नास्ता उपलब्ध करून दिला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी निशा नायक ही देखील होती. जनता कर्फ्युमध्ये जनता घरात तर पोलीस अधिकारी, कर्मचारी हे बंदोबस्तासाठी रस्त्यावर …
Read More »नेरुळ रेल्वेस्थानकात बसविले वॉश बेसिन
नवी मुंबई : बातमीदार केरळी समाजाने अनोखा उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. नवी मुंबई बाहेरून येणारी सर्वाधिक गर्दी ही रेल्वे स्थानकांतून येत असते हे लक्षात घेत या समाजाने सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग असलेल्या नेरुळ रेल्वे स्थानकात दोन्ही बाह्य बाजूस तीन-तीन वॉश बेसिन बसवून दिले आहेत. तसेच साबण उपलब्ध करून …
Read More »उपमहापौर जगदीश गायकवाड यांचे आवाहन
पनवेल : कोरोनोचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्यापरिने लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी जनजागृती करीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत. त्याच अनुषंगाने आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा उपमहापौर जगदीश गायकवाड यांनीही आपल्या खास शैलीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
Read More »गजबजलेल्या पनवेलमध्ये शुकशुकाट
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकाहद्दीत रविवारी जनता कर्फ्यूला चांगला पाठिंबा मिळाला. पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे आणि खारघरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बहुसंख्य नागरिकांनी घरातच बसून राहणे पसंद केले. पण अनेकांनी कर्फ्यू असताना सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे पसंद करून कोरोनाबाबत जागरूक नसल्याचे दाखवून दिले. कोरोनापासून बचावास आपली सज्जता दाखवण्यासाठी पंतप्रधान …
Read More »नवी मुंबईत जनता कर्फ्यू यशस्वी
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अख्खा देशच लॉकडाऊन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेले आवाहन राष्ट्रीय हित लक्षात घेऊन सर्वांनीच पाळले. यात आधुनिकतेचा साज चढवलेली नवी मुंबई देखील मागे राहिली नाही. नवी मुंबईतील नागरिकांनी देखील 100 टक्के यशस्वी बंद पाळून राष्ट्रीय आपत्तीला लढण्यास आम्ही खंबीर व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper