Breaking News

महत्वाच्या बातम्या

मास्कचा काळाबाजार करणार्यांना मोक्का लावा -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी वांद्रे येथे मास्कचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी मास्कचा साठा करून काळाबाजार करणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे, मात्र …

Read More »

राज्यात कोरोनाचा चौथा बळी

65 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू मुंबई : प्रतिनिधी जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून राज्यात मंगळवारी (दि. 24) कोरोनामुळे 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्यूमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. मंगळवारी मृत्यू झालेला इसम 15 मार्च रोजी …

Read More »

गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा -राज्यपाल

मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे शक्य नाही. यास्तव शासनाला सहकार्य …

Read More »

आपत्कालीन ग्रुपकडून सीसीटीव्हीची डागडुजी

खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या बिकट संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. खोपोली शहरात पोलिसांच्या कार्याला मदत करणारा तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे व खांबाची स्थिती सुस्थितीत राखण्यासाठी खोपोली आपत्कालीन मदत ग्रुपच्या सदस्यांनी डागडुजी आणि दुरुस्ती केली. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे खांब एकतर वाकले किंवा झुकले होते. त्यामुळे अपघाताच्या शक्यतेसह …

Read More »

खालापूरकरांना महावितरणचा शॉक

खोपोली ः बातमीदार कोरोनाच्या दहशतीमुळे घरात बसून राहणार्‍या खालापूर आणि परिसरातील नागरिकांना महावितरणच्या गलथान कारभाराने जीव नकोसा झाला आहे. येथे आठवडाभरापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. उन्हाळ्यामुळे वाढते तापमान आणि सध्या कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मुलांनीसुद्धा कोरोनाच्या सुटीत मैदानाऐवजी टीव्ही …

Read More »

कर्जत तालुक्यात गावांची अघोषित संचारबंदी

अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे, मात्र तरीदेखील किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकल या अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी अत्यावश्यक वस्तू मिळत असल्याने लोक समाधानी असून खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, मिठाईची दुकाने मात्र …

Read More »

भाजपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त : भारतीय जनता पक्ष पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र.19च्या वतीने पनवेलकरांसाठी गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा (जछङखछए टणखन उेाशिींळींळेप) आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ुुु.रिीशीहींहरर्ज्ञीी.ळप  या वेबसाइट भेट द्या. स्पर्धा ही गुढीपाडवाच्या दिवशी बुधवारी (दि. 25) सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असेल. सर्व विजेत्या स्पर्धकांना …

Read More »

संचारबंदी डावलणार्यांवर गुन्हे दाखल; उरणमध्ये पोलिसांची धडक कारवाई

उरण : वार्ताहर : महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री पासून संचारबंदी लागू केल्याने नागरिकांनी उरण बाजार पेठेत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गर्दी करू नका, कामाशिवाय घराच्या बाहेर फिरू नका, किराणा दुकानांत समान खरेदी करताना अंतर ठेवा, अशाप्रकारची जनजागृती पोलीस गाड्यांतून करीत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे …

Read More »

जमावबंदीत रस्त्यावर फिरणार्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

पनवेल : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पनवेल परिसरात जमावबंदी लागू केली असतानाही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहने रस्त्यावर काढत आहेत. अशांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल …

Read More »

कोरोना : नेरेपाडा, शिरढोणमध्ये नो एण्ट्री

बाहेरील नागरिकांना गावात प्रवेशबंदी; तरुणांसह ग्रामस्थ सरसावले पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्चपर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. …

Read More »