Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल आरटीओचा बडगा

1735 चालकांवर कारवाई ; नियमांचे उल्लंघन केल्याने ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित पनवेल : बातमीदार सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या चालू वर्षात 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2019 या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1735 वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले. यात मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन …

Read More »

वळसे-पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 29) पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी (दि. 29) उद्धव …

Read More »

आगरदांडा पोर्ट विकासाच्या ‘मार्गा’वर

केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणार्‍या महत्त्वाकांशी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सन 2020 पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण झालेली दिसून येतील व दिघी बंदरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे 3500 कोटीची गुंतवणूक असणारा आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराचा विकास करण्यावर …

Read More »

पाण्याची घंटा योग्यच

अनेकदा, एखाद्या तहानलेल्या मुलाने वर्गात पाणी पिऊ का असे विचारल्यावर शिक्षकांकडून ‘सुटीत का नाही प्यायलास, आता तास पूर्ण झाल्यानंतरच पिता येईल’ वगैरे शिस्तीच्या नावाखाली सुनावले जाते. हे असे होण्याऐवजी सर्व मुलांना एकत्रितपणे पाणी प्यायला विशिष्ट वेळ नेमून देणे मुलांकरिता सोयीचेच ठरेल. अडीच-तीन वर्षांच्या मुलांना आताशा शाळेत धाडले जाते ते मुळात …

Read More »

विमानतळबाधितांना अंतिम मुदत

15 डिसेंबरपर्यंत गावे रिकामी करण्याचे आदेश पनवेल : बातमीदार नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित होणार्‍या 10 गावांपैकी सात गावांतील ग्रामस्थांनी स्वतःची घरे पूर्णपणे पाडलेली नाहीत. उलवे, तरघर, कोंबडभुजे गावांतील 70 टक्के ग्रामस्थांचाही यात समावेश आहे. ग्रामस्थांनी स्वत:ची घरे पाडून गावे रिकामी करावीत, यासाठी सिडकोकडून अनेकदा अंतिम मुदत देण्यात आली, मात्र ही …

Read More »

आरे मेट्रो कारशेडच्या स्थगितीवर भाजपची टीका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ‘जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि 15 वर्षात आधीच …

Read More »

सापमुक्तीसाठी जंगल भ्रमंती

रहिवासी भागात आढळलेल्या सापांना मिळाला हक्काचा अधिवास खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील जनमानसात सर्प आणि प्राणीप्रेमींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. खेडोपाडी, दुर्गम वाडी वस्त्यांतच नव्हे, तर हाऊसिंग सोसायट्या आणि नागरी वस्तीत साप आढळून आला की त्याची माहिती तातडीने सर्पमित्रांना दिली जाते. सर्पमित्र मिळालेल्या जुजबी माहितीनुसार …

Read More »

अवजड वाहनांचा ‘रात्रीस खेळ चाले’; कर्जतमध्ये वीजग्राहकांना नाहक त्रास

कडाव : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरून गेल्या आठ दिवसांपासून मोठमोठ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून, त्यासाठी  रात्री सात-आठ तास वीजपुरवठा बंद केला जात असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरून नाशिक, शहापूर, मुरबाड येथून येणार्‍या अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. सध्या कंपन्यांसाठी लागणार्‍या बॉयलर्सचे मोठमोठे पार्ट याच मार्गावरून …

Read More »

भडसावळे यांचा कृषी पर्यटनाचे जनक पुरस्काराने सन्मान

कर्जत : बातमीदार कृषी पर्यटनाची सुरुवात भारतात सर्वात आधी सुरू करून कृषी पर्यटन संकल्पना जन्माला घातल्याबद्दल आणि कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक स्रोत निर्माण करून दिल्याबद्दल नेरळ येथील शेखर भडसावळे यांना कृषी पर्यटनाचे जनक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) …

Read More »

नागोठणे-रोहे रस्त्याचे ग्रहण सुटणार तरी कधी?

वाहनचालकांसह प्रवाशांचा सवाल नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे ते रोहे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा हा सुमारे चार किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांसह प्रवाशांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला लागलेले ग्रहण सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली …

Read More »