Breaking News

महत्वाच्या बातम्या

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा

मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. राज्यात उन्हाच्या झळा असून, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. …

Read More »

राज्यात मतदानाची सरासरी कमी होण्यास जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. राज्यात शेवटच्या टप्प्यात  सरासरी 57 टक्के मतदान झाले. राज्यात मतदानाची सरासरी कमी होत  असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मतदान कमी होण्याला वाढते तापमान हे कारणीभूत आहेच, पण त्याबरोबरच निवडणूक शाखा, निवडणुकीच्या कामासाठी नेमलेले कर्मचारी आणि ओळखपत्र बनवणारे ठेकेदारही जबाबदार आहेत. …

Read More »

म्हावरं मिळेना जाळ्यानं; मच्छीमार हतबल!

एलईडी लाईट, पर्सनेट जाळी नौकांमुळे समुद्रात मच्छीचा दुष्काळ रेवदंडा : प्रतिनिधी एलईडी लाईट व पर्सनेट जाळी असलेल्या नौका फार मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी करीत असल्याने समुद्रात मच्छीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्रात जाऊनही जाळ्यांत म्हावरं येत नसल्याने स्थानिक मच्छीमार बांधव हतबल झाले आहेत. थेरोंडा, आग्राव, रेवदंडा, कोर्लई, बोर्ली परिसरातील  कोळी …

Read More »

रोह्यात काजू बियांची आवक वाढली

आंब्याच्या कैर्‍याही खवय्यांच्या पसंतीला रोहे ः प्रतिनिधी येथील बाजारपेठेत काजू बिया आणि आंब्यांच्या कैर्‍यांची  आवक वाढली असून, त्यामुळे आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे. काजू बियांची भाजी आणि आंब्यांच्या कैर्‍याच्या कापून तयार केलेल्या फोडी हे कोकणातील खवय्यांचे आवडते खाद्य पदार्थ आहेत. मार्च, एप्रिलमध्ये खवय्ये या दोन्ही फाळांचा बाजारात शोध घेताना …

Read More »

क्लासला गेलेली दोन मुले बेपत्ता

पनवेल : बातमीदार कळंबोली येथील क्लास सुटल्यावर बाहेर पडत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मुलांचे अपहरण केले आहे. अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीच्या क्लासला गेलेला 16 वर्षीय अभिषेक बाळासाहेब राखुंडे व दुसरा 14 वर्षीय अभय सुरेंद्र पांडे क्लासला गेले होते, मात्र ते घरी परत न आल्याने पालकांनी …

Read More »

कर्जत मतदारसंघाची मतदान यंत्रे सकाळी निघाली…

सर्वात उशिरा झाला प्रवास सुरु कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघांतील कर्जत विधानसभा मतदारसंघात 67.76 टक्के मतदान झाले आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे मंगळवारी (दि. 30) सकाळी साडेसात वाजता पुणे येथे बालवाडी येथे जाण्यास निघाली.दरम्यान, सर्वात उशिरा कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या मतपेट्या बालेवाडी येथे पोहचल्या आहेत. पाच ठिकाणी ईव्हीएम मशीन …

Read More »

दुर्गम गावांतही मतदारांचा उत्साही प्रतिसाद

कर्जत, उरणमध्ये 67 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान अलिबाग : जिमाका मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि. 29) मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. त्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत केलेल्या सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत. विशेषत: अधिकारी …

Read More »

मुकी जनावरेही शोधताहेत पाण्याचा आसरा; प्रचंड उकाडा

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्याने मुकी जनावरेही त्रस्त झाली आहेत. उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळावा यासाठी गुरे पाण्याचा आसरा घेताना दिसत आहेत. मुके प्राणी पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. पाताळगंगेच्या पात्रात गाई-म्हशी ठाण मांडत आहेत. उन्हाचा …

Read More »

रसायनी परिसरात शांततेत मतदान

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी परिसरात शांततेत मतदान झाले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अंदाजे 55 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पडावी यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद …

Read More »

मतदान झाले, आता दीर्घ प्रतीक्षा! मावळमधील निकालाच्या अंदाजाबाबत सर्वत्र चर्चा

उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) मतदान झाले. या मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी उभे असताना खरी लढत मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे अशीच आहे. त्यामुळे मावळचा राजकीय मावळा कोण याकडे मतदारसंघातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे …

Read More »