Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेणचे वैभव धनावडे साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित

पेण : रामप्रहर वृत्त नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पेणचे वैभव दिलीप धनावडे यांना साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनावडे यांच्या ‘माझा एकलेपणा’ या चारोळी संग्रहाला पुण्यातील साहित्य गौरव या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. तो संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. …

Read More »

वरसोली समुद्रकिनार्यावर स्वच्छता अभियान

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रिझम सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था व स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, …

Read More »

पाल्हे येथे बहरतेय मानवनिर्मित कांदळवन

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील पाल्हे येथे खाडीकिनारी 20 हेक्टर क्षेत्रावर लावलेले मानवनिर्मित कांदळवन चांगले बहरत आहे. ओसाड जमिनीवर सागरी पर्यावरण बहरू लागले आहे. कांदळवनाच्या आधाराने स्थानिकांना चिंबोर्‍या, मासे पकडण्याचे साधन निर्माण झालेले आहे. झाडावर सुगरणीची घरटे दिसू लागले आहेत. यासह इतर पक्षांचीही किलबिलाट सुरू झाली आहे. वाढते औद्योगिकीकरण, शेतीसाठी कांदळवनाची …

Read More »

सुधागड लेणी : ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज

सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. तालुक्यात ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेण्यांचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशातील अभ्यासक येथे दौरेदेखील करत असतात, मात्र या प्राचीन लेण्यांकडे …

Read More »

विरोधकांचे स्वप्नरंजन

2014 साली देशातील सत्ता काबीज केल्यानंतर भारतीय जनता पक्ष संघटनात्मक पातळीवर इतक्या वेगाने वाढला की विरोधीपक्ष पूर्णत: निष्प्रभ झाले. अध्यक्षपदी असताना अमित शहा यांनी पक्षवाढीचे हे अफाट काम केले. त्याउलट प्रभावी नेतृत्वाअभावी याच काळात काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय होत गेली. पक्षाच्या या अवस्थेमुळे आज हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. …

Read More »

कर्जत-पनवेल शटलसाठी भाजपचे पाऊल

सर्वेक्षण करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे निर्देश पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वेस्थानकांदरम्यान शटल सेवा सुरू करण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव …

Read More »

ओबीसींचे अस्तित्व संपविण्याचा कट उघड

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचा ठाकरे सरकारवर आरोप पनवेल ः रामप्रहर वृत्त काँग्रेस तसेच शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरूंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. हा …

Read More »

तामिळनाडूत भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; देशाचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू

चेन्नई, नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी (दि. 8) तामिळनाडूमध्ये झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. भारतीय वायुदलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. या दुर्घटनेत एकूण 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

अवकाळी पावसामुळे पांढर्या कांद्याची पुनर्लागवड करण्याची वेळ

अलिबाग : प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकर्‍यांना पांढर्‍या कांद्याची पुनर्लागवड करावी लागली आहे. त्यामुळे यंदा पांढरा कांदा बाजरात उशिरा येईल. अलिबाग तालुक्यातील कार्ले, सागाव, खंडाळा, वाडगाव या परिसरात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते. अलिबाग तालुक्यात पांढर्‍या कांद्याचे 250 ते 300 हेक्टर पीक …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ साजरा

चौक : रामप्रहर वृत्त विद्याप्रसारणी सभा चौक सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक यांचा 2020 व 21 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षेत विशेष प्रावीण्याने उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »