Breaking News

Ankit Shah

चई गावातील विजेचे खांब कोसळण्याच्या स्थितीत; महावितरणचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील चई गावात 30 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले विजेचे खांब जिर्ण झाले असून, ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. अनेकदा तक्रारी करूनदेखील महावितरण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही. दरम्यान, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? असा सवाल भाजप कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी उपस्थित केला आहे. …

Read More »

उन्हाळी शिबिरात बालगोपाळ रमले

महाड : प्रतिनिधी : अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झालेली शहरातील बच्चे कंपनी आता सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरात रमले असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांनाही अशा विनामुल्य उन्हाळी शिबिराचा आनंद गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यामुळे मिळाला आहे. आपल्याच शाळेत झालेल्या या शिबीरात मुले आनंदाने रमूनही गेली. …

Read More »

नेरळ धरणाची स्वच्छता करण्यासाठी पाणी सोडले

कर्जत : बातमीदार : नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटीशकालीन धरण दगड, माती आणि प्लास्टिक कचर्‍यात हरवून गेले होते. सदर धरणाची स्वच्छता करण्याची मागणी नेरळमधील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार   ग्रामपंचायतने धरणाचा दरवाजा उघडून  अस्वच्छ पाणी सोडून दिले. त्यावेळी मासे पकडण्यासाठी मासेमारी करणार्‍यांनी गर्दी केली. कर्जत-कल्याण राज्यमार्ग लगत असलेल्या नेरळ येथील  धरणाच्या पाण्यामध्ये गावातील …

Read More »

महाडमध्ये 15 विंधण विहिरीं पूर्ण; ग्रामस्थांना दिलासा

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून 64 विंधणविहिरी खोदण्यास मंजूरी मिळाली असून, त्यापैकी 15 विंधणविहिरींची खोदाई पूर्ण झाल्याने तेथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. महाड तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना असल्या तरीही पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने, या गावांना टंचाई निर्माण होते. त्यातच तालुका हा …

Read More »

मानवतेच्या पुजार्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

शांती, क्षमा, दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध, ज्ञानशील, ईश्वरी पुरुष या प्रत्येक शब्दाशी तंतोतंत जुळणारे विनम्रशील व्यक्तिमत्त्व म्हणजे पद्मश्री डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी. 14 मे हा आप्पासाहेबांचा जन्मदिन. समाजप्रेमाची, भक्ती सामर्थ्याची गंगा ज्यांच्या अंगणात अवतरली आणि ज्यांच्या निस्सिम कर्तृत्वाचा नंदादीप चंद्र-सूर्य असेपर्यंत सातासमुद्रापार प्रज्वलित राहील असा करुणेचा महामेरू, …

Read More »

मी, ते राज ठाकरे पाहिले….. आणि आज हे !!

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशात आणि मुंबई प्रांतावर कॉग्रेसच सरकार होत. मुंबई सह महाराष्ट्र आणि सौराष्ट्र अस हे मुंबई इलाक्याच नाव होत. मराठीची गळचेपी आणि संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन पेटल तेच मुळात त्यावेळच्या कॉग्रेस सत्तेच्या विरोधात. हे आंदोलन दडपण्याचा आणि ठेचुन काढण्याचा सर्वोतोपरी प्रतत्न मोरारजी देसाई आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी …

Read More »

दुष्काळापाठोपाठ भाववाढ?

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कार्यकाळात शेतीमालाचे भाव बर्‍यापैकी आटोक्यातच राहिले आहेत. विशेषत: सप्टेंबर 2016 पासून मार्च 2019पर्यंत यात फार मोठी भाववाढ न दिसल्याचे या विषयातील जाणकार नमूद करतात. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. या मतदानासोबत लोकसभेच्या 543पैकी जवळपास 89 टक्के मतदारसंघातील मतदान पूर्ण …

Read More »

राष्ट्राच्या सक्षमतेसाठी युवकांचे पाठबळ!

यंदा दोन लाख नवीन मतदारांनी पहिल्यांदाच लोकशाहीच्या महोत्सवात मतदानाचा हक्क बजावला. गेल्या पाच वर्षांतील बदल पाहून विकासाकडे नवमतदारांचा कल झुकलेला दिसत आहे. जगात युवकांचा देश अशी ख्याती असलेल्या भारतात 2022 पर्यंत सर्वाधिक काम करण्याची क्षमता असणार आहे. ही कामाची भूक पूर्ण करण्यासाठी युवक भाजपाकडे आशेने पाहत आहे. कारण गेल्या पाच …

Read More »

अजेंडा मणिशंकर…

लोकसभा निवडणूक संपत आलेली आहे. सहाव्या ़फेरीचे मतदान आज रविवारी होत आहे आणि पुढल्या रविवारी शेवटच्या सातव्या ़फेरीचे मतदान व्हायचे आहे. पण अजून कुठे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता मणिशंकर अय्यर यांचा आवाज नाही, म्हणून अनेकजण कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. कारण भाजपाच्या अनेक स्टार प्रचारकांपैकी मणिशंकर अय्यर एक मोठे नाव आहे. त्यांच्या …

Read More »

जाहिरातींमध्ये हरवले नेरूळ व सानपाडा रेल्वेस्थानक

नवी मुंबई : प्रतिनिधी  : नेरूळ व सानपाडा स्थानकाला जाहिरातींनी ग्रासले आहे. नेरूळ स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, तसेच संपूर्ण स्थानकातील बाह्य बाजू जाहिरातींनी वेढल्यामुळे ही स्थानके जाहिरातींत हरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या स्थानकांना गलिच्छ रूप प्राप्त झाले असून आधुनिक स्थानकांचा टेंभा मिरवणार्‍या सिडकोला मात्र जाहिरातदारांचे अतिक्रमण दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त …

Read More »