Breaking News

Ankit Shah

ना. गडकरींच्या सभेने प्रचाराचा माहोल बदलला

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे अखेरच्या टप्प्यात मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेने पनवेल, उरण …

Read More »

स्टार प्रचारक…

महाराष्ट्राला अनेक थोर वक्त्यांची परंपरा लाभली आहे. निवडणुका आल्या की या स्टार प्रचारकांची सवय महाराष्ट्रातील जनतेला झाल्याशिवाय राहत नाही. विद्यमान स्थितीतही अनेक स्टार प्रचारक आहेत. त्यांच्याकडे भाषणाची वेगळीच कला आहे. दुर्दैवाने अनेक स्टार प्रचारक राजकीय पटलावरून कायमचे निघून गेले आहेत. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा… लोकसभेच्या महासंग्रामाचा महाराष्ट्रातील अखेरचा अर्थात …

Read More »

मतदारराजा जागा हो..!

आपल्या लोकशाहीप्रधान देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. याबरोबरच राज्यातील ‘मत’संग्राम संपुष्टात येईल. आतापर्यंत झालेली मतदानप्रक्रिया पाहता नवमतदार वाढले, पण मतदानाची टक्केवारी काही वाढली नाही. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन आपल्या परीने प्रयत्न, जनजागृती करीत असले …

Read More »

मावळच्या विकासासाठी महायुतीच्या बारणेंचा संकल्पनामा

ना. गिरीष बापट यांच्या हस्ते प्रकाशन मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून झोपडपट्टीधारकांना 500 स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर उपलब्ध करुन देणे, आयटी सुविधा, तरुणांसाठी रोजगार, शैक्षणिक धोरण, औद्योगिक धोरण, रेल्वे सुविधा वाढविणे, रस्ते दळणवळण सुधारणा व जलवाहतूक, पर्यटन विकास, बंदर विकास करणे आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी …

Read More »

पेणची मिठागरे लुप्त होण्याच्या मार्गावर

पेण : अनिस मनियार : तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील आगरी, कोळी लोकांचा पूर्वी मिठाच्या शेतीचा मूळ व्यवसाय होता. एकेकाळी कामगारांनी गजबजलेली येथील मिठागरे आता ओस पडली आहेत. पेण तालुक्यात 30 ते 40 मिठागरांतून आता जेमतेम 5 ते 6 आगारे शिल्लक राहिली आहेत. भविष्यात मिठागरांचा इतिहास पुसला जाणार आणि यापुढे शालेय जीवनात मिठागरे …

Read More »

बोडणी गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य

अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील बोडणी कोळीवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे पाण्यासाठी मारूतीच्या शेपटाप्रमाणे लागलेली लांबचलांब  हंड्यांची रांग ही येथील पाणी टंचाईची तीव्रता दाखवित आहे.  अलिबाग तालुक्यातील बोडणी हे गाव समुद्रालगत आहे. चारशेहून अधिक लोकवस्ती असलेल्या या गावात पाण्याची मुबलक सुविधा नाही. वाढत्या वस्तीला पुरेल इतके पाणी दररोज उपलब्ध होत …

Read More »

पाली पोलीस ठाणे आवारात पक्ष्यांचा किलबिलाट

धान्य, पाण्याची व्यवस्था जांभूळपाडा : प्रतिनिधी : रणरणत्या उन्हाचा फटका संपूर्ण जीवनसृष्टीलाच बसत आहे. तापमानात होणारी कमालीची वाढ प्राणिमात्रांच्या जीवनावर बेतत आहे, मात्र पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्याच्या आवारात पशूपक्ष्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पक्ष्यांसाठी झाडावर घरटीही बनविण्यात आली आहेत. त्यामुळे पाली पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत …

Read More »

कलोते मोकाशी धरण परिसरात फार्महाऊस मालकाचे अतिक्रमण

धरणपात्रातून माती आणि पाण्याची लूट खोपोली : प्रतिनिधी : खालापूर हद्दीतील कलोते मोकाशी धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली घट अनेकांच्या फायद्याची ठरत असून, धरण पात्रात थेट पोकलन आणि डंपरचा मुक्त वावर सुरू झाला आहे. कर्जत जलसंपदा  विभागाकडे असलेले खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण 43 वर्षापूर्वी बांधण्यात आले. सिंचनासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांना हे धरण …

Read More »

कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला पालकांनी लावले टाळे

दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक 2 मेपासून सुरू करणार उपोषण कर्जत : बातमीदार : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 25) शाळेला टाळे ठोकले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे होणारे …

Read More »

रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली

158 गावे, वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा अलिबाग : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे  उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुसरीकडे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात 30 गावे आणि 128 वाड्यांमध्ये 19 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवर …

Read More »