Breaking News

Ramprahar News Team

विवाह सोहळ्यांना दुष्काळाची बसतेय झळ

औरंगाबाद : प्रतिनिधी लग्नातील बँड, वाजंत्री, थाटमाट, कपडे या हौसमौज, मानापमान सांभाळण्यासाठी किंवा प्रतिष्ठेपायी करण्यात येणार्‍या खर्चाला दुष्काळी परिस्थितीमुळे फाटा दिला जात आहे. आटोपशीर आणि मोजक्याच वर्‍हाडींच्या उपस्थितीत टिळा-साखरपुड्यातच लग्न उरकण्याकडे कल असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. मध्यंतरी काहीशी थांबलेली ‘झट मंगनी पट ब्याह’सारखी लग्नाची गेटकेन पद्धत पुन्हा …

Read More »

गुजरातच्या केशरची रत्नागिरीत निर्मिती

रत्नागिरी : प्रतिनिधी हवामान, माती यांच्या साधर्म्यामुळे गुजरातच्या प्रसिद्ध ‘केशर’ आंब्याची यशस्वी लागवड रत्नागिरीत होत आहे. मार्चअखेरीस गुजरातहून वाशीला येणारा केशर या वर्षी रत्नागिरीतून फेब्रुवारीतच वाशीत गेला आहे. गणेशगुळेतील (ता. रत्नागिरी) बागायतदार सुनील लाड यांच्या बागेतील आठ पेट्या वाशीला पाठविण्यात आल्या आहेत. हापूसप्रमाणेच त्याला दर मिळाल्याचे समाधान बागायतदारांना आहे. शनिवारी …

Read More »

पुण्यात प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू

पुणे : प्रतिनिधी प्राण्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, उपाहारगृहे, खेळघर असे अनेक पर्याय उपलब्ध होत असतानाच आता पुण्यात प्राण्यांसाठीचे देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. ‘विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक’तर्फे बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. डॉ. कस्तुरी भडसावळे या पशु नेत्रतज्ज्ञ महिलेच्या कल्पनेतून या नेत्र रुग्णालयाची स्थापना झाली …

Read More »

भर सभेत मोदींचा जयजयकार

चुरू : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले असताना, चुरूमधील सभेत उपस्थित नागरिकांकडून मोदी, मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोदींनी नुकतेच भारतीय लष्कर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला कोठे, कसा आणि कधी घेईल हे ठरवेल, असे म्हटले होते. त्यानुसार …

Read More »

महाराष्ट्रातील दुष्काळाचे चित्र पालटेल -गडकरी राज्याला 10 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राने संपूर्ण राज्यात 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती  घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचे दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा विश्वास केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी  राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय …

Read More »

जेएनपीटी-सेझद्वारे गुंतवणूक; मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचाही दावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जहाज मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सागरमाला उपक्रमाने पोर्ट आधारित औद्योगिकरणाचा शोध घेतला असून, भारतीय अर्थव्यस्थेचा तो मुख्य स्तंभ असणार आहे. ज्यामुळे विकास होऊन औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे. ही संकल्पना लक्षात घेता जेएनपीटी-सेझ 685 एकरावर बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र उभारीत आहे. याद्वारे औद्योगिकरणाला चालना देऊन भारतीय निर्यात …

Read More »

थंडीमुळे भाज्यांची आवक कमी

पनवेल : बातमीदार थंडीमुळे एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. परिणामी फरसबी, गवार, कारले या भाज्यांचे दर 20 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापार्‍यांनी दिली. भाजीपाला बाजारात दररोज 550 ते 600 गाड्या भाजीपाला येत असतो, मात्र 500 ते 525 गाड्यांची नोंद झाली आहे. त्यात फरसबी, गवार आणि …

Read More »

उरणचे शेतकरी फळपिकांकडे आकर्षित

चिरनेर : प्रतिनिधी पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्‍या फळपिकांकडे उरण विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. फळझाडांच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नाचा स्रोत अधिक लाभ देणारा ठरत असल्याने गेल्या काही वर्षापासून फळपीक लागवड क्षेत्र उरण तालुक्यातील चिरनेर भागात विस्तारात आहे. कोकणची माती ही फळपिकांसाठी उत्तम असल्याने पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीचे …

Read More »

पळस्पे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : प्रतिनिधी अमरदिप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या पळस्पे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकताच विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमास बुद्धिबळ राष्ट्रीय पंच मंगला बिराजदार, सहआयुक्त शंकर बिराजदार, प्रा. फातिमा मुझावर, अमरदीप संस्थेचे अध्यक्ष नासीर खान, मुख्याध्यपिका व्ही. एस. वेटम, ‘कफ’चे सदस्य राजकुमार ताकमोगे, ललिता गोविंद, अस्लम …

Read More »

पेण वढावमध्ये भाजपचे कमळ फुलले

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या वढाव ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले असून, त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत आंनदाचे वातावरण आहे.  वढाव येथील थेट सरपंच पदाच्या भाजप उमेदवार पूजा अशोक पाटील यांनी 1560 मतांनी विजय मिळविला. तर ग्रामपंचायत सदस्य पदावर ओमकार गजानन म्हात्रे, ज्योती हनुमान म्हात्रे (प्रभाग …

Read More »