नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता धार्मिक वातावरणही तापू लागले आहे. राज्यात चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. 11 ते 29 एप्रिल या काळात मतदान होणार आहे, परंतु रमजानमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याच्या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केला असतानाच निवडणूक …
Read More »निर्व्यसनी रहा आणि यशस्वी व्हा -शिक्षणतज्ञ विद्या वाडकर
पनवेल : प्रतिनिधी अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि हार्मोनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 9) पनवेल तालुक्यातील सांगुर्ली येथे व्यसनमुक्तीपर उपक्रम घेण्यात आला. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नभी घेऊ उत्तुंग भरारी हा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षणतज्ञ तथा चित्रपट अभिनेत्री विद्या वाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, निर्व्यसनी …
Read More »‘द्रोणागिरी’वर विजय दिन
उरण : बातमीदार उरण तालुक्यात समुद्रकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचा 280वा विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 10 मार्च 1739 रोजी सरखेल मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून स्वराज्यात घेतला होता. उरण तालुक्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार असलेला द्रोणागिरी किल्ला …
Read More »दुचाकीस्वारांनी मोबाईल खेचला
पनवेल : बातमीदार रस्त्याने चालत घरी जात असलेल्या 27 वर्षीय तरुणाच्या हातातील 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना रोडपाली येथे घडली. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत. रोडपाली येथील जयवंतसिंग मनजितसिंग धालीवाल हे रोडपाली येथील घरी रोडने पायी फोनवर बोलत जात असताना, त्यांच्याजवळून रोडपाली सेक्टर 17कडे …
Read More »वाकडी-दुंदरे रस्ता खड्ड्यात; परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा वाकडी-दुंदरे रस्ता खड्यात गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात आली नाही; तर परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वाकडी, चिंचवली, रिटघर, दुंदरे या गावांना जोडणारा हा तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता असून, मोठ्या संख्येने …
Read More »आमदार सुरेश लाड यांच्या सभेत महिलांचा संताप ; हाळ गावच्या पाणी प्रश्नावरून गोंधळ
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील हाळ गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात हाळ गावच्या महिलांनी पाणी प्रश्नावरून आमदार सुरेश लाड यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने महिलांच्या दोन्ही गटांत शाब्दिक युद्ध रंगले. त्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. खोपोली नगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध प्रभागांत विविध विकासकामांचे उद्घाटन स्थानिक आमदार सुरेश …
Read More »रक्त तपासणी अहवाल चुकीचा; अंबानी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा
खोपोली : प्रतिनिधी रक्त तपासणी अहवाल चुकीचा दिल्याने एकनाथ दगङू सांगळे (49, रा. लोधीवली खालापूर) यांनी लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने एकच खळबळ माजली आहे. एकनाथ सांगळे हे 24 जुलै 2017 रोजी धीरूभाई अंबानी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या वार्ङबॉय महेंद्र …
Read More »‘विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा’; म्हसळा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन
म्हसळा : प्रतिनिधी महिलांनी सर्व क्षेत्रांत स्वतःला सिद्ध केलं आहे. गाव विकास प्रक्रियेतही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त पोषण आहार सप्ताह कार्यक्रमात मत व्यक्त करताना केले. महिलांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध विषयांच्या …
Read More »प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मारहाण; तरुणीची आत्महत्या
औरंगाबाद : प्रतिनिधी प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी 16 वर्षीय मुलीला मारहाण केली. बेदम मारहाण आणि संशय सहन न झाल्यामुळे मुलीने विष प्राषन करून आत्महत्या केली. दिव्या प्रभू गव्हाणे असे मृत मुलीची नाव असून, ती सोयगावजवळील बनोटी(वाडी) येथे राहते. आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात …
Read More »राम मंदिरासाठी सरकारवर पूर्ण विश्वास : भैयाजी जोशी
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सत्तेत असणार्यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे आम्ही मानतो. त्यांच्या प्रतिबद्धेबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही. अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper