Breaking News

Ramprahar News Team

अतानू दास अंतिम 16मध्ये; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला नमविले

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये अतानू दासने अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अटीतटीच्या या सामन्यात अतानूने ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचाही पराभव केला. अतानू दासने आधी चीनी ताइपेच्या डेंग यू-चेंगचा 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. अतानूने हा सामना 27-26, 27-28, 28-26, 27-28 आणि …

Read More »

सिंधू उपांत्यपूर्व फेरीत : पदकापासून केवळ दोन विजय दूर

टोकियो ः वृत्तसंस्था विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत 12व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा 40 मिनिटांमध्ये …

Read More »

बॉक्सर सतीश कुमारची उपांत्य फेरीत धडक

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 16व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1ने पराभूत केले. सतिशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत. पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली तर दुसर्‍या फेरीत …

Read More »

भारत उपांत्यपूर्व फेरीत; टोकियो ऑलिम्पिकध्ये अर्जेंटिनावर मात

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाला साखळी फेरीतील सामन्यात धूळ चारली आहे. भारताने अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 3-1च्या फरकाने जिंकला. या विजयासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही …

Read More »

पनवेलच्या सोसायटी मित्र मंडळाकडून महाडमधील पूरग्रस्तांना मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील मिडलक्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत बुधवारी (दि. 28) सकाळी महाडला रवाना करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोसायटी मित्र मंडळाचे कौतुक केले. या वेळी मंडळाचे …

Read More »

महाडमध्ये भाजपचे अखंड सेवाकार्य; नेत्यांकडून पाहणी, मदतवाटपाचाही घेतला आढावा

महाड ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन, तसेच दरड कोसळल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त व दरडग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी केंद्र व राज्यातील भाजप नेते व लोकप्रतिनिधींनी तत्काळ धाव घेऊन पाहणी केली, तसेच पूरग्रस्तांना मदत देणे सुरू केले. त्यामुळे महाडकरांना मोठा दिलासा मिळाला. भाजप नेत्यांनी बुधवारीही (दि. 28) महाडमध्ये …

Read More »

महाड, पोलादपूर तालुक्यातील 188 गावे अद्यापही अंधारात

अलिबाग ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड व पोलदपूर तालुक्यातील 268 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 80 गावांमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे, मात्र अतिवृष्टी होऊन सात दिवस झाले तरी या दोन तालुक्यांतील तब्बल 188  गावांमधील 68 हजार 856 वीजग्राहक आजही अंधारात आहेत. अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर तालुक्यात महावितरणचे अतिउच्च दाबाचे …

Read More »

महाडमध्येे साकारणार एनडीआरएफचा बेसकॅम्प

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता महाड येथे राष्ट्रीय आपत्ती दलाचे (एनडीआरएफ) बचाव पथक कायमस्वरूपी असणार आहे. यासाठी आवश्यक सुमारे पाच एकर क्षेत्र असलेली शासकीय जागा दुग्धव्यवसाय विभागाने देण्याबाबत सहमती दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 28) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत शासन निर्णय …

Read More »

भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे …

Read More »

बँक बुडीत निघाल्यास ठेवीदारांना 90 दिवसांत मिळणार पैसे; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदीमुळे देशात अनेक बँका गेल्या वर्षात बुडीत निघाल्या. बँका बुडाल्याने किंवा आर्थिक घोटाळे झाल्याने त्या बँकांतील ठेवीदारांच्या ठेवींचे काय? त्यांना पैसे कधी मिळणार? असे प्रश्न सातत्याने उपस्थित होत होते. यावर मार्ग काढत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना 90 …

Read More »