हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला ही रायगड जिल्ह्याची शान आहे. या रायगड जिल्ह्यात अनेक शूर मावळे, सरदार होऊन गेले. प्राणाची पर्वा न करता त्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी आपले प्राण पणास लावले. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचे कुडपणचे शेलारमामा यांनी क्रूरकर्मा …
Read More »नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली
कर्जत : बातमीदार गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी भागात सोमवारी (दि. 19) एक दरड कोसळली. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता वाहतुकीस बंद झाला होता, मात्र स्थानिक आणि टॅक्सी चालकांनी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात या घाटरस्त्यावर दरड कोसळण्याची ही दुसरी घटना …
Read More »पाली पुलावरील वाहतूक ठप्प; सुधागडात सतर्कतेचा इशारा
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील नद्या, नाले, रहदारीचे रस्ते, पाण्याने तुडुंब भरले आहेत. जनजिवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार व सोमवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पाली, जांभुळपाड्यासह सुधागड तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. आंबा नदीवरील पाली येथील पुलावरील वाहतूक ठप्प …
Read More »खालापूर तालुक्यात पावसाचे धूमशान
खोपोली : प्रतिनिधी खोपोलीसह खालापूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पर्जन्यराजाच्या तुफान फटकेबाजीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिळफाटा भागातील डीसी नगरमध्ये याही वर्षी पाणी तुंबल्याने खोपोली नगरपालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडल्याची चर्चा होती. रविवारपासून पावसाची फटकेबाजी …
Read More »मुरूड तालुक्यात वरुणराजाचे थैमान; राजपुरीत चार घरांवर दरड कोसळली
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, आठ दिवसात तब्ब्ल 1342 मिलीमीटर पाऊस कोसळला. आतापर्यंत मुरुड तालुक्यात एकूण 2563 मिलीमीटर पाऊस झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद पूल कोसळल्यामुळे मुरुडहून अलिबाग, पनवेल, मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. या मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक भालगाव व …
Read More »रायगडात मुसळधार पावसाने उडवली दाणादाण
पेणमध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरले पेण : प्रतिनिधी मुसळधार पावसाने पेण तालुक्यात धुमाकूळ घातला असून, नदी व खाडीकिनारी असलेल्या ग्रामस्थांची झोप उडाली आहे. तालुक्यातील गावा गावात नदीचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी रौद्र रूप धारण केल्याने पेण तालुक्यातील बाळगंगा नदी तुडूंब …
Read More »स्मृती मंधाना झाली 25 वर्षांची; शुभेच्छांचा वर्षाव
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाचा रविवारी (दि. 18) 25वा वाढदिवस. 18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या स्मृतीने कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव चमकवले आहे. तिच्यावर रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावर झाला. भाऊ आणि वडिलांना पाहून क्रिकेट खेळण्यास शिकलेल्या स्मृतीने लहान वयातच क्रिकेटमध्ये करिअर करायचे …
Read More »टी-20 स्पर्धेत थरार सहा चेंडूंत सहा षटकार मारून संघाला केले विजयी
गिब्सन पार्क ः वृत्तसंस्था शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले अनेक थरारक सामने आजवर झालेले आहेत, पण विजयासाठी एका षटकात 35 धावांची गरज असताना एका फलंदाजाने सहा चेंडूंत सहा षटकार मारून अशक्यप्राय वाटणारा विजय संघाला साकारून दिला आहे. आयर्लंडमधील स्टील्स टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. क्रेगाघो आणि बालीमेना या दोन …
Read More »डी कॉकने मोडला धोनीचा विक्रम
डब्लिन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्या वनडे सामन्यात 120 धावांची खेळी करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सर्वांत कमी वयात ही कामगिरी केली आहे. हा विक्रम पूर्वी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने 30 वर्ष आणि …
Read More »कोरोना आणि मानवी जीवन
मानवी जीवन अमूल्य असून जीवनात जर कुठली गोष्ट महत्त्वाची असेल तर ती आहे आरोग्य. वैश्विक कोरोना महामारीत आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. म्हणूनच तर एरवी आरोग्याकडे कळत-नकळतपणे दुर्लक्ष करणारी मंडळीही अलीकडच्या काळात आरोग्याबाबत सजग झाल्याचे दिसून येते. कोरोनाने संपूर्ण जगभरात अक्षरश: वाताहत केली. एखादे वादळ येऊन गेल्यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper