Ramprahar News Team

हम भी है जोश में!

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. सलामीला यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेश व न्यूझीलंडला नमवून साखळीतील चौथ्या व अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचे माफक आव्हान सात विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात भारताचे पारडे जड होते आणि संघाने अपेक्षेप्रमाणे विजय साकारला. खरंतर याआधीचे सामने तगड्या …

Read More »

स्मरण थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारींचे

निरूपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती. 1 मार्च 1922 रोजी जन्मलेले नानासाहेब समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य केले. नानासाहेबांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात 400 …

Read More »

मराठीचा हुंकार आणि पुनश्च स्वातंत्र्यवीर सावरकर!

2020चा फेब्रुवारी महिना हा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मुळात या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आले. 29 फेब्रुवारी ही तारीख साधारणपणे चार वर्षांनी येते. हा जन्मदिवस फार कमी लोकांचा आहे. एकेकाळच्या काँग्रेसच्या अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंदिरा गांधी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत टक्कर देणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते मोरारजी देसाई यांचा जन्मदिवस. तसं …

Read More »

गोठा, मोळ्या जळून खाक

कर्जत : बातमीदार  तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्‍याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …

Read More »

आगीत घर भस्मसात

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील नेराव येथील एका घराला गुरुवारी (दि. 27) रात्री आग लागली. या आगीत हे घर जळून खाक झाल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घराची सावली हरपल्याने घरमालकावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नेराव गावातील तुकाराम कोरपे यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आग …

Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे धरणे

अलिबाग : प्रतिनिधी शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात याव्यात, यासह राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 27) मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक परिषदेतर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, संघटनमंत्री भगवानराव साळुंखे, …

Read More »

मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूडमधील नागरिकांची ससेहोलपट

मुरुड : प्रतिनिधी जानेवारीतील मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूड तालुक्यातील गरीब व मध्यमवर्गीयांची ससेहोलपट होत आहे. फेब्रुवारी महिना संपला तरीही जानेवारी महिन्याचा रॉकेल टँकर मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातील रॉकेल टँकर कोणी पळवून नेला याची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मुरूड तालुक्यात दोन गॅस सिलिंडर असणार्‍यांची संख्या …

Read More »

खोपोलीत मोबाइलचोरांची टोळी गजाआड; लाखोंचा ऐवज जप्त

खोपोली : प्रतिनिधी येथील एसटी स्टॉपवर बुधवारी बसमध्ये चढणार्‍या प्रवाशाच्या खिशातील मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खोपोली पोलिसांनी खालापूर टोलनाक्यावर सापळा लावला आणि मोबाइलचोरांच्या टोळीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक लाख 34 हजार 700 रुपये किमतीचे मोबाइल जप्त करण्यात आले. वावोशी (ता. खालापूर) येथील …

Read More »

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; माणगावमध्ये अधिकार्यांना धरले धारेवर

माणगाव : प्रतिनिधी पाटबंधारे विभागाने साफसफाईची कामे व्यवस्थित न केल्यामुळे डोलवहाळ बंधार्‍याच्या डाव्या कालव्याचे पाणी  माणगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळत नाही. त्यामुळे या गावांच्या परिसरातील उन्हाळी भातपीक धोक्यात आले आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या देगाव येथील शेतकर्‍यांनी शुक्रवारी (दि. 28)  दुपारी माणगाव येथील पाटबंधारे कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता श्री. भाट …

Read More »

रेवस-करंजा पूल काळाची गरज

अलिबाग तालुक्यातील सारळघोळ, सांबरकूंड, रेवस- करंजा हे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण व्हावेत असे आलिबाग तालुक्यातील जनतेला वाटते. कधीतरी बातमी आली की या प्रकल्पांबाबत चर्चा सुरू होते. काही दिवसांनी ती चर्चा थांबतें. लोक विसरून  जातात. आता  रेवस – करंजा पुलाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.  या पुलाचा सविस्तर …

Read More »