Breaking News

Ramprahar News Team

गोठा, मोळ्या जळून खाक

कर्जत : बातमीदार  तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्‍याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …

Read More »

आगीत घर भस्मसात

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील नेराव येथील एका घराला गुरुवारी (दि. 27) रात्री आग लागली. या आगीत हे घर जळून खाक झाल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घराची सावली हरपल्याने घरमालकावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नेराव गावातील तुकाराम कोरपे यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आग …

Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे धरणे

अलिबाग : प्रतिनिधी शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात याव्यात, यासह राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 27) मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक परिषदेतर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, संघटनमंत्री भगवानराव साळुंखे, …

Read More »

मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूडमधील नागरिकांची ससेहोलपट

मुरुड : प्रतिनिधी जानेवारीतील मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूड तालुक्यातील गरीब व मध्यमवर्गीयांची ससेहोलपट होत आहे. फेब्रुवारी महिना संपला तरीही जानेवारी महिन्याचा रॉकेल टँकर मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातील रॉकेल टँकर कोणी पळवून नेला याची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मुरूड तालुक्यात दोन गॅस सिलिंडर असणार्‍यांची संख्या …

Read More »

खोपोलीत मोबाइलचोरांची टोळी गजाआड; लाखोंचा ऐवज जप्त

खोपोली : प्रतिनिधी येथील एसटी स्टॉपवर बुधवारी बसमध्ये चढणार्‍या प्रवाशाच्या खिशातील मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खोपोली पोलिसांनी खालापूर टोलनाक्यावर सापळा लावला आणि मोबाइलचोरांच्या टोळीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक लाख 34 हजार 700 रुपये किमतीचे मोबाइल जप्त करण्यात आले. वावोशी (ता. खालापूर) येथील …

Read More »

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; माणगावमध्ये अधिकार्यांना धरले धारेवर

माणगाव : प्रतिनिधी पाटबंधारे विभागाने साफसफाईची कामे व्यवस्थित न केल्यामुळे डोलवहाळ बंधार्‍याच्या डाव्या कालव्याचे पाणी  माणगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळत नाही. त्यामुळे या गावांच्या परिसरातील उन्हाळी भातपीक धोक्यात आले आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या देगाव येथील शेतकर्‍यांनी शुक्रवारी (दि. 28)  दुपारी माणगाव येथील पाटबंधारे कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता श्री. भाट …

Read More »

रेवस-करंजा पूल काळाची गरज

अलिबाग तालुक्यातील सारळघोळ, सांबरकूंड, रेवस- करंजा हे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण व्हावेत असे आलिबाग तालुक्यातील जनतेला वाटते. कधीतरी बातमी आली की या प्रकल्पांबाबत चर्चा सुरू होते. काही दिवसांनी ती चर्चा थांबतें. लोक विसरून  जातात. आता  रेवस – करंजा पुलाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.  या पुलाचा सविस्तर …

Read More »

धुमसती राजधानी

काँग्रेसने तर सारेच ताळतंत्र सोडले असल्याने त्यांच्याकडून दिल्लीकरांचीही वेगळी अपेक्षा नसावी. काँग्रेसच्या याच नकारात्मक वृत्तीमुळे दिल्लीने त्यांना सलग दुसर्‍यांदा सपशेल नाकारले हे तर निवडणुकीत दिसलेच. ही वेळ चिखलफेकीची किंवा राजकारण खेळण्याची नव्हे तर एकमेकांना सांभाळून घेणार्‍या एकजुटीची आहे हेच धुमसणारी दिल्ली सांगू पाहात आहे. जातीय दंगलींनी होरपळलेल्या राजधानी दिल्लीतील विद्वेषाचे …

Read More »

‘त्या’ नराधमावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार तालुक्यातील धोत्रे गावात राहणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कृष्णा नामा आगीवले याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्जत तालुक्यातील धोत्रे गावातील 13 वर्षीय पीडित मुलीच्या घरात तिची आई आणि लहान बहिणीशिवाय कोणीही पुरुष मंडळी नाही, ही …

Read More »

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी -प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण

मुरुड : प्रतिनिधी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत  गुरुवारी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी मराठी ही राजभाषा आहे. तिला ज्ञानभाषा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. चव्हाण यांनी …

Read More »