Breaking News

Ramprahar Reporters

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला पनवेल परिसरातील आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या परिसरातील ठिकाणांची पाहणी केली व आढावा घेतला. निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी रायगड जिल्ह्यात धडक दिली. या वादळामुळे पनवेलमध्येही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तेथील रस्ते बंद झाले होते, तर विजेचे खांब आणि विद्युत …

Read More »

नुकसानग्रस्तांना शासनाने सर्वतोपरी मदत करावी -आमदार महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्तकोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळात उरण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या घरांचे आणि शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून राज्य शासनाने नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना भरीव मदत करावी, तसेच अनेक ठिकाणी खंडित झालेला विद्युत पुरवठा पुर्वता सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत, अशी …

Read More »

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पनवेल तालुक्यातील वादळग्रस्त वाड्या-पाड्यांमध्ये पाहणी

नुकसान झालेल्या आदिवासींची विचारपूस पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यात आदिवासी वाड्या आणि पाड्यांना सर्वाधिक बसला. त्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 5) वादळग्रस्त …

Read More »

कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नाही

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली धोक्याची जाणीव मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नसल्याचा आरोप फडणवीस यांनी यात केला आहे. कोरोनामुळे झालेले अनेक मृत्यू नैसर्गिक किंवा अन्य कारणांमुळे झाल्याचे दाखवण्यात येत असल्यामुळे संसर्गाचा धोका …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे पनवेलमधील जनजीवन विस्कळीत

पनवेल ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने पनवेल तालुक्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. नागरिकांच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागांत वीजही नव्हती. त्यामुळे पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 4) पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. शुक्रवारीही पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले …

Read More »

पनवेल मनपाचा स्वच्छतेसाठी पुढाकार

नागरिकांची होणार दुर्गंधीपासून मुक्तता पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, पालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यासाठी आधुनिक मशिनरीचा वापर आणि मनुष्यबळ वाढणार असल्याने पनवेलकरांची आता दुर्गंधीपासून मुक्तता होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. 4) प्रवीण पाटील …

Read More »

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपरिक नियम न लावता राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे, …

Read More »

कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच

मुंबई ः प्रतिनिधीसध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाविरोधात दिवसरात्र लढा देत आहेत. प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोना काळात माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही अपार मेहनत करीत आहेत, तर दुसरीकडे आपले कर्तव्य बजावताना काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, …

Read More »

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 8909 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेली आहे, तर या विषाणूने आतापर्यंत 5815 लोकांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 303 लोकांनी …

Read More »