Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह उपनगर भागात शनिवारी (दि. 12) पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात …

Read More »

राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पटोलेंच्या भूमिकेमुळे ‘मविआ’त खळबळ मुंबई ः प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये …

Read More »

‘बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चे नाव नाकारले असते’

नाशिक : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ …

Read More »

जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर

राज्यातील अनलॉकला आठवडा पूर्ण मुंबई ः प्रतिनिधीअनलॉकनंतर शुक्रवारी (दि. 11) राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या 14 जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 5 जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची …

Read More »

मुंबईत इमारत कोसळून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 9) रात्री 11च्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे.मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्री रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ लहान मुले आणि तीन …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचाही ‘दिबां’च्या नावाला पाठिंबा

मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. त्यात आता रिपाइं (आठवले गट)पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यायला हवे, अशी मागणी करीत आपला पाठिंबा दर्शविला आहे.या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »

मुंबईत पाणी भरून दाखवलं; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला टोला; नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल

मुंबई ः प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. मुंबई महापालिका आणि शिवसेनेने मुंबईत पाणी भरून दाखवलं, अशा शब्दांत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे.  मुंबईसह उपनगरात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येणार हे माहीत असूनही आणि हवामान विभागाने मुसळधार …

Read More »

एपीएमसीत कोविड लसीकरण केंद्र सुरू; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी बाजार आवारातील 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी वाशीतील एपीएमसी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ इमारतीत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ, वफा …

Read More »

10 जूनच्या आंदोलनासाठी नवी मुंबईतही बैठका; विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यासाठी 10 जून रोजी होणार्‍या मानवी साखळी इशारा आंदोलनासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. त्याप्रमाणे जुईनगर, सारसोळे, नेरूळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या बैठका झाल्या. या बैठकांना उत्स्फूर्तपणे विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचा मुंबईतही एल्गार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जून रोजी ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन …

Read More »