डोंबिवली : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 14) डोंबिवली येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 24 तारखेला होणार्या आंदोलनासंदर्भात दिशा ठरविण्यात आली. या बैठकीला नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार …
Read More »महाराष्ट्रातील सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडेल -दानवे
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पटोले यांना येत्या तीन वर्षांत मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. एवढेच नाही तर येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातले …
Read More »वाशीच्या महात्मा फुले भवनमध्ये 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी प्रभाग क्र.63 मधील नागरिकांसाठी 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने माजी सभापती संपत शेवाळे, स्थानिक नगरसेविका दयावती शेवाळे यांच्या सौजन्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाशी व फोर्टिस हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर-17 …
Read More »नवी मुंबईत धोकादायक इमारतींमध्ये वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मालाड मालवणीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील नेरूळमध्येही इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. रात्रीच्यावेळी झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र या …
Read More »काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरावा; रामदास आठवले यांचा नाना पटोलेंना सल्ला
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा दावा नाना पटोले यांनी अलीकडेच केला होता. त्यावरून आता काँग्रेसवर टीका करण्यात येत असून, काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या व्यापार्यांसह सिडकोच्या एमडींसोबत बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसीतील वाढीव एफएसआय, शिल्लक एफएसआय, पुनर्बांधणी, कन्व्हेंस डिड, एपीएमसीला लागू होणारे सिडकोची धोरणे, भूखंड हस्तांतरण अशा सिडको अखत्यारीत असणारे विविध विषयांसंदर्भात बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या धान्य मार्केट, भाजीपाला, फ्रुट व कांदा बटाटा मार्केटच्या व्यापार्यांसह सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबर बैठक झाली. …
Read More »नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासा; रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेत नवी मुंबई शहरात झपाट्याने कोरोना संसर्ग पसरल्याने एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळ हा 80 दिवसांपर्यंतखाली आला होता. आता दुसरी लाटेत रुग्ण कमी झाले असून रुग्णदुपटीचा कालावधी 1208 दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना …
Read More »शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय
दरेकरांचा संजय राऊतांना टोला मुंबई ः प्रतिनिधीराजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही आता अशीच चंचल झाली आहे, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे …
Read More »सिंहगड, लोणावळ्यात अतिउत्साही पर्यटकांची गर्दी
पुणे ः प्रतिनिधीकोरोना महामारीमुळे सिंहगड पर्यटक व गडप्रेमींसाडी खुला करण्यात आलेला नसतानाही रविवारी (दि. 13) पहाटेपासून ते दुपारपर्यंत येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. तसेच सुटीचे निमित्त साधत शनिवार-रविवारी लोणावळा, नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मुंबईकरांच्या वाटाही लोणावळ्याच्या दिशेने …
Read More »मानखुर्द उड्डाणपुलाच्या नावावरूनही शिवसेनेचे मतपेटीचे राजकारण
भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येथील प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचे रणझुंझार नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या समस्त रायगडवासीयांसह बहुसंख्य जनतेच्या मागणीबाबत ठाकरे सरकार हटवादी भूमिका घेत आहे. आपल्या मागणीवर नवी मुंबई, रायगडमधील भूमिपुत्र ठाम असून टोकाचा संघर्ष करण्याच्या पवित्र्यात आहेत. आता घाटकोपर-मानखुर्द लिंक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper