Breaking News

मुंबई – नवी मुंबई

ऐश्वर्या, आराध्याह कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ‘बिग बी’ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या या …

Read More »

राज्य सरकार कोरोनावरून लक्ष विचलित करतेय : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी विरोधक हे सरकार पाडणार असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. स्वत:च स्वत:ला मारून घ्यायचे आणि रडल्याचे नाटक करायचे अशी सध्या नवी पद्धत आली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सध्या शिवसेना या पद्धतीचा वापर करीत आहे. कोणीही सरकार पाडणार नसताना स्वत:च कांगावा करायचा आणि मुलाखतीही देण्याचे प्रकार सुरू आहेत. …

Read More »

नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये ड्रोनद्वारे होणार सॅनिटायझर फवारणी

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिकेने कोरोनाला आळा घालण्यासाठी कंबर कासल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार पालिका येत्या काळात शहरात ड्रोनद्वारे सॅनिटायजर  फवारणी करण्याच्या विचारात आहे. सुरुवातील दाटीवाटीने वसलेल्या विभागात कंटेन्मेंट झोनमध्ये ही फवारणी करण्यात येणार असून त्यानंतर उर्वरित भागात करण्यात येणार आहे.  शनिवारी (दि.11) पालिकेने मुख्यालयाच्या आवारात ड्रोनद्वारे …

Read More »

‘तो’ मेसेज म्हणजे अफवा!

मुंबई : प्रतिनिधीसोशल मीडियावर सध्या 140 या अंकाने सुरुवात होणार्‍या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह केल्यास आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढली जाते, असा मेसेज व्हायरल होत आहे, मात्र या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. जोपर्यंत बँक अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड …

Read More »

बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेने धक्काच बसला होता -शरद पवार

मुंबई ः प्रतिनिधीआणीबाणीच्या काळात संपूर्ण देश इंदिरा गांधींच्या विरोधात होता. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा गांधींसोबत उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाहीत, तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी उमेदवारही उभा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने आम्हाला सगळ्यांना धक्काच बसला होता, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणीबाणीच्या काळातील …

Read More »

आता अभिनेत्री केतकी चितळेकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख

मुंबई : प्रतिनिधीस्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असतानाच आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहून महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे ती ट्रोल होत आहे.जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ सोशल …

Read More »

गणेशमूर्तीला उंचीचे बंधन

राज्य सरकारकडून भाविकांसाठी नियमावली मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने 12 मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीला चार फुटांचे, तर घरगुती मूर्तीला दोन फुटांचे बंधन घालण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य …

Read More »

नवी मुंबईत लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार 13 तारखेच्या माध्यरात्रीपासून 19 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवेत मोडणारे एपीएमसी मार्केट व एमआयडीसी सुरू राहणार आहे. गेले तीन दिवस पालिका क्षेत्रातील रुग्णस संख्येत वाढ झालेली पाहायला …

Read More »

‘दहावी, बारावी परीक्षेचा निकाल याच महिन्यात’

हिंगोली : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 10) माहिती दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलैदरम्यान, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचे गायकवाड यांनी हिंगोली येथे बोलताना सांगितले. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने …

Read More »

नवी मुंबईतील मृत्यूदरात वाढ; कोरोनामुळे महिनाभरात 182 बळी

पनवेल : बातमीदार पहिली टाळेबंदी उठवल्यानंतर 9 जुलैपर्यंत महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार 455ने वाढली असून मृतांची संख्या 96 वरुन 278 झाली आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूदर हा 3.13 वरून 3.26 पर्यंत वाढला आहे. 9 जूनला नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 3063 होती तर कोरोनामुळे 96 मृत्यूमुखी पडले होते. राज्यशासनाने 8 जूननंतर …

Read More »