मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 151 तालुके आणि 268 मंडळांमध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रातील या दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधीचा वापर करून चारा छावण्या, पाण्याच्या टाक्यांसाठी या निधीतून खर्च करण्याचा शासकीय अध्यादेश आम्ही बुधवारी (दि. 22) काढत आहोत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या दुष्काळात लोकप्रतिनिधी चारा छावण्यांना भेट …
Read More »हॉटेलचालकांनी वृक्षावर पेटवले दिवे; वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग
नवी मुंबई ः प्रतिनिधी रात्रीच्या अंधारात ग्राहकांना प्रामुख्याने आपला व्यवसाय दिसावा म्हणून पदपथावर असणार्या वृक्षांवर संबंधित व्यावसायिक विद्युत दिवे लावत असल्याच्या घटना नवी मुंबईत नेहमीच पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे चक्क वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील आवारात असणार्या हॉटेलचालकाने तिथे असणार्या वृक्षावर विद्युत माळ लावून वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग केला असून, संबंधित …
Read More »रायगडमध्ये आठ ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 20 जिल्ह्यांतील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील सहा हजार 719 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सहारिया …
Read More »पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी सरकारकडून अध्यादेश जारी
मुंबई ः प्रतिनिधी न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने शुक्रवारी (दि. 17) अध्यादेश जारी केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा …
Read More »ब्लॅकमेलिंग करणार्या पाच पोलिसांचे निलंबन
नवी मुंबई ः प्रतिनिधी मध्यरात्री कामावरून घरी चाललेल्या महिला-पुरुषाला खोट्या गुन्ह्यात अडवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणार्या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून पीडितांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. सागर ठाकूर, स्वप्नील काशिद, श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे व वैभव कुर्हाडे अशी त्यांची …
Read More »मुख्यमंत्र्यांचा धडाका; सहा दिवसांत 22 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा ; 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद
मुंबई ः प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा वापर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद सेतू’ उपक्रमातून मागील सहा दिवसांत 22 जिल्ह्यांतील तब्बल 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेत त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देण्याचे कामही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. मागील सहा दिवस ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून …
Read More »यंदा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरणार? मान्सूनला उशीर; तरीही शेतकरी आशेवर
मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाईने ग्रासलेल्या देशवासीयांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला आहे़. मान्सून यंदा पाच दिवस उशिरा म्हणजे 6 जून रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे़. ‘स्कायमेट’ने यापूर्वी मान्सूनचे आगमन 4 जून रोजी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. …
Read More »अॅड. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी आता अॅड. प्रदीप घरत मांडणार बाजू ; अश्विनी बिद्रे कुुटुंबीयांची मागणी सरकारने केली मान्य
मुंबई ः प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम नको, …
Read More »‘उमेद’तर्फे खाद्यपदार्थ, वस्तूंचे प्रदर्शन
नवी मुंबई : प्रतिनिधी पनवेल-खारघर मधील ग्रामविकास भवन येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे व विविध उत्पादनांचे, तसेच लोकपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार उत्पादने ठेवण्यात आली आहेत. 10 मे पासून बीड जिल्ह्यातील महिला बचत गट येथे आपले खाद्यपदार्थ व वस्तू येथे विक्रीसाठी आल्या आहेत. …
Read More »नेरूळ येथे सहा वाहनांची धडक
नवी मुंबई : प्रतिनिधी सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ उड्डाणपुलावर सहा वाहनांची रविवारी (दि. 12) दुपारी एकमेकांना धडक बसली. सर्वात पुढे असलेल्या कार चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. यात कोणीही गंभीर झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास नेरूळ उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने सुसाट जात असलेल्या कारचालकाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper