Breaking News

महत्वाच्या बातम्या

सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा

खोपोली : प्रतिनिधी दोन वर्षे कोरोना संकट व त्या अनुषंगाने लावण्यात आलेली बंधने व गरीब आदिवासी कुटुंबांवर ओढवलेले आर्थिक संकट याची जाणीव ठेवत खोपोली सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी (दि. 5) आदिवासी व अन्य विविध समाजांतील 44 गरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दोन …

Read More »

पालीत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम

पाली : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सुधागड-पाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता. 4) पाली पंचायत समिती प्रांगणात करण्यात आले. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी पोषण रॅली काढण्यात आली. या वेळी उपस्थितांनी पोषण शपथ घेतली. रांगोळी व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकस आहार प्रात्यक्षिक दाखविण्यात …

Read More »

चौल नाक्यावर वाहतूक कोंडी

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग व मुरूड रस्त्यावर वाढत्या वाहतुकीचा ताण मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौल नाक्यावर पडत असून, येथे नित्य वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. दिवसेंदिवस अलिबाग व मुरूड तालुक्यात पर्यटकांच्या वाढत्या संख्येने येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी येथील रस्त्याला वाहतुकीचा ताण पडून वारंवार वाहतूक कोंडी …

Read More »

माथेरानला पाणीपुरवठा करणारा शारलोट तलाव गळातच

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष कर्जत : बातमीदार माथेरानमधील पर्यटनस्थळांपैकी एक, तसेच संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो त्या शारलोट तलावात गाळाचे साम्राज्य असून या वर्षीही शारलोट तलाव गाळमुक्त होण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. माथेरानमध्ये आलेला पर्यटक हा पर्यटनस्थळ शारलोट तलावाला आवर्जून भेट देतोच. सभोवताली गर्द वनराई, पश्चिमेला दरी असे …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रीवर्धन बाजारपेठ फुलली

नारळाबरोबरच यंदा केवडाही महागणार! श्रीवर्धन : प्रतिनिधी कोरोनामुळे गतवर्षी सण, उत्सव साजरे करण्यावर शासनाने काही बंधने घातली होती, मात्र यंदा निर्बंधात  शिथिलता दिल्यामुळे गणेशोत्सवासाठी श्रीवर्धन बाजारपेठ चांगलीच सजलेली दिसत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी लागणार्‍या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतशी पूजा आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची …

Read More »

नवी मुंबई एपीएमसीत सुकामेव्याचे दर स्थिर

गणेशभक्तांसह ग्राहकांमध्ये समाधान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या महिन्यात तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जाचे भारताच्या बाजारपेठेत पडसाद पाहायला मिळाले होते. लगेचच मुंबई एपीएमसी बाजारात सुक्यामेव्याच्या बाजारभावात वृद्धी झाली होती, परंतु गणेशोत्सवात तोंडावर आला असताना सुक्यामेव्याचा बाजारभाव स्थिर असल्याने गणेशभक्तांसह ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वांच्याच पसंतीचे आणि अधिक खाल्ले जाणारे बदाम …

Read More »

पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने

पनवेल : वार्ताहर पोलीस लवकरात लवकर एखाद्या घटनेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत आता पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा महिंद्रा बोलेरो जीप देण्यात आल्यामुळे पोलिसांचे काम अजून सुकर होणार आहे. एखादा अपघात घडल्यास, आग लागल्यास किंवा एखादी दुर्घटना झाल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी कमीत …

Read More »

महावितरणची कर्जतमध्ये थकबाकीदारांवर कारवाई

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वीज महावितरण विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुलीमध्ये विक्रमी रक्कम जमा झाली असून, कर्जत तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांना आपली वीजजोडणी कापली जाण्याची भीती वाटू लागली आहे. कर्जत तालुक्यात 76 हजार वीजग्राहक असून त्यातील असंख्य ग्राहकांकडे करोडो रुपयांची थकबाकी आहे. 9 …

Read More »

नियम पाळून सण साजरे करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी गणेशोत्सव हे सण नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले कोविड 19च्या नियमांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी, पोलीस पाटील, दक्षता कमिटी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी …

Read More »

कृष्णा नागरने ‘सुवर्ण’ जिंकले; सुहास यथिराज रौप्यपदकाचा मानकरी; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकच्या रविवारी (दि. 5) समारोपाच्या दिवशी भारताची घोडदौड कायम राहिली आणि बॅडमिंटपटू कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तत्पूर्वी बॅडमिंटनमध्येच सुहास यथिराजने रौप्यपदक पटकाविले. यासोबतच भारताची एकूण पदकसंख्या 19 झाली. ही भारताची आजवरची सर्वोच्च कामगिरी आहे. कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करीत सुवर्णपदकावर …

Read More »