Breaking News

महत्वाच्या बातम्या

केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार स्वतःचे अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी रेमडेसीवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. कोरोनाचा …

Read More »

‘देशात लॉकडाऊनचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली. देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही, असे …

Read More »

‘ब्रुक फार्मा’च्या अधिकार्‍यावर पोलिसांची दंडेलशाही; भाजपने धरले राज्य सरकारला धारेवर

मुंबई ः प्रतिनिधी रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात विलेपार्ले पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिकार्‍याला ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारला. पोलीस ठाण्यात वाद झाल्यानंतर तेथील अधिकारी आणि …

Read More »

रोह्यात 44 रुग्णांची वाढ

रोहे ः प्रतिनिधी तालुक्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी (दि. 17) एका दिवसात 44 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने रोह्यात  खळबळ उडाली आहे. ही वाढती आकडेवारी तालुक्याची चिंता वाढवणारी ठरली आहे. रोहा तालुक्यात 11 ते 17 एप्रीलपर्यंत एकूण 242 कोरोना रुग्ण आढळलेे असून, या कालावधीत 88 रुग्णांनी कोरोनावर …

Read More »

नेरळ, कळंब बाजारपेठा रविवारी बंद

कर्जत : बातमीदार कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. आठवडाभर निर्बंध आणि वीकेण्डला पूर्णतः लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत आहे. तालुक्यातील नेरळ, कळंब, कशेळे, कडाव येथील बाजारपेठा शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणूंची साखळी खंडित करण्यासाठी …

Read More »

महाडमधील शेकडो प्राथमिक शाळा मोडकळीस

रायगड जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीचे प्रस्ताव धूळ खात पडून महाड : प्रतिनिधी तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींची सध्या बिकट अवस्था झाली आहे. 2018 पर्यंत जवळपास 43 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत होत्या. त्यातच गतवर्षी निसर्ग चक्रीवादळात सुमारे 100 शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. मागणी करूनही दुरुस्ती प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषदेकडे खितपत पडून …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे रायगडात शुकशुकाट

पेणमध्ये खवय्यांची झाली पंचाईत पेण : प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवत, त्यांना केवळ होम डिलीव्हरीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेडिकल स्टोअर्समधील कर्मचार्‍यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. जेणेकरुन कोरोना विषणूंची …

Read More »

कबड्डीपटू मयूर कदमचे जोरदार स्वागत

उरण ः वार्ताहर उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे झालेल्या 68व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या संघातून खेळणारा उरण तालुक्यातील बोकडविरा येथील अष्टपैलू खेळाडू मयूर जगन्नाथ कदम याचे गावात जोरदार स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. मूळचा अलिबाग तालुक्यातील तळवली गावचा मयूर बालपणापासून बोकडविरा गावचा रहिवासी …

Read More »

वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा : भारताच्या रवीला सुवर्णपदक

अल्माटी : वृत्तसंस्था भारताचा युवा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सलग दुसर्‍या वर्षी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. अनुभवी बजरंग पुनियाला मात्र दुखापतीमुळे सुवर्णपदकावर पाणी सोडावे लागले, तर करन आणि नरसिंह यादव यांनी कांस्यपदकाच्या लढती जिंकल्या. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात रवीने अंतिम फेरीत इराणच्या अलिरेझा सारलकला 9-4 …

Read More »

मुंबईची पुन्हा कमाल!; हैदराबादवर साकारला रोमहर्षक विजय

चेन्नई ः वृत्तसंस्था रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करीत सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 बाद 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आला. मुंबईच्या कायरन …

Read More »