Breaking News

महत्वाच्या बातम्या

श्रीवर्धन तालुक्यात भातशेती बहरली

श्रीवर्धन : प्रतिनिधी यावर्षी पावसाची सुरुवात 3 जून रोजीच झाली. तीन जून रोजी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले व या चक्रीवादळाच्या सोबतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जून महिन्याच्या आठ तारखेपासून नियमित पणे मोसमी पाऊस पडू लागला. शेतकर्‍यांनी रोहिणी नक्षत्र निघाल्यावर पेरलेले भात चक्रीवादळाच्या वेळी पडलेल्या पावसामुळे शेतात उगवले होते …

Read More »

तीन पत्रकारांना खालापुरात अटक; मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

खोपोली : प्रतिनिधी अर्णव गोस्वामी संपादक असलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्म हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनुज कुमार, जसपाल सिंह व प्रदीप धनवडे अशी या तिघांची नावे आहेत. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील कंपन्या आजपासून होणार सुरू

खारघर : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसीमध्ये मागील साडेचार महिन्यापासून बंद असलेल्या 804 उद्योग धंदे सुरु करण्यास शासनाने परवानगी दिल्याने गुरुवारपासून संपूर्ण तळोजा एमआयडीसी लॉकडाऊन नंतर प्रथमच सुरु होणार आहे. लाखो कामगार वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. तळोजा एमआयडीसीच्या मध्ये एकूण 973 कारखाने आहेत. यापैकी 169 उद्योग धंदे अत्यावश्यक सेवा पुरवीत असल्याने …

Read More »

नागोठणे टपाल कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहक त्रस्त

भाजपकडून निवेदन नागोठणे : प्रतिनिधी येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांचे नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात बुधवारी (दि. 9) निवेदन देण्यात आले. याबाबत येथील उप डाकपाल …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे निधन

कर्जत : प्रतिनिधी बातमीदार माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र न्यूज 24चे संपादक संतोष पवार (वय 54) यांचे बुधवारी (दि. 9) सकाळच्या सुमारास वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. संतोष पवार यांची रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचा आधारस्तंभ म्हणून ओळख होती. रायगड प्रेस क्लबचे …

Read More »

फुकटचा तमाशा

सर्वप्रथम हे आवर्जून नमूद केले पाहिजे की मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर संबोधणे आणि मुंबई पोलिसांना माफिया म्हणून दूषणे देणे खचितच समर्थनीय नाही. या दोन्ही गंभीर घोडचुका बॉलिवुडची अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्या. त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. परंतु अशी बेफाम वक्तव्ये केल्याची शिक्षा म्हणून तिच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवणे ही एकप्रकारची …

Read More »

राजिपची सभा काही मिनिटांतच आटोपली; व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उडाला सावळागोंधळ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. 9) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन सभेत तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे गोंधळ उडाला. या वेळी सदस्यांचा अधिकार्‍यांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ही सभा काही मिनिटांमध्येच आटोपण्यात आली. राजिपची अर्थसंकल्पीय सभा 11 मार्च 2020 रोजी झाली होती. त्यानंतर 10 जून रोजी सभा आयोजित करण्यात आली …

Read More »

पनवेल तालुक्यात आढळले तब्बल 372 नवे रुग्ण

एकाचा मृत्यू; 214 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 9) कोरोनाचे 372 नवीन रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 254 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्सकडून भरीव देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील एएससी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 8) करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे …

Read More »

मराठा आरक्षणाला स्थगिती; अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; मविआ सरकारला मोठा धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असे सांगत न्यायालयाने या आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपविण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च …

Read More »