Breaking News

महत्वाच्या बातम्या

सतीश लेले ‘कोविड योद्धा’ने सन्मानित

रेवदंडा ः प्रतिनिधी – नागाव येथील कार्यतत्पर तसेच परिसरातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे रेवदंडा अर्बन बँकेचे संचालक सतीश लेले यांना कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल परशुराम सेवा संघ महाराष्ट्र व मानवाधिकार सुरक्षा संघ या दोन राज्यस्तरावरील नामांकित संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर …

Read More »

माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षांची पक्षनेतृत्वावर नाराजी

माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महमूद धुंदवारे यांनी पक्षनेतृत्व तसेच  तटकरे कुटुंबीयांबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली असून, लवकरच आपण शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. महमूद धुंदवारे गेली तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत. शेवटी शनिवारी (दि. 4) त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली …

Read More »

रोह्यात पावसाचा जोर कायम; नदीनाले तुडूंब; बळीराजा सुखावला

रोहे ः प्रतिनिधी – रोहा शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोहा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यने नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चांगला पाऊस पडल्याने तालुक्यात लावणीसह अन्य शेतीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सुरू झालेला पाऊस सातत्याने बरसत असल्याने शनिवारीही (दि. 4) पावसाचा जोर कायम असल्याचे …

Read More »

बेशिस्त नागरिकांना दणका

खोपोली पालिकेकडून दंडात्मक कारवाई खोपोली ः प्रतिनिधी – खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी गुरुवारी (दि. 2) एका बैठकीत खोपोली नगरपालिका प्रशासन कोरोनाबाबत देण्यात आलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करीत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खोपोली पालिका प्रशासनाकडून आक्रमक भूमिका घेत नगरपालिका हद्दीत विविध भागांत धडक कारवाई करण्यात आली. यात रस्त्यावर …

Read More »

चिंताजनक! रायगडात तब्बल 353 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाच्या तब्बल 353 रुग्णांची नोंद झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 186, पनवेल ग्रामीणमधील 47, रोहा तालुक्यातील 33, अलिबाग तालुक्यातील 19, महाड तालुक्यातील 14, उरण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी 13, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण …

Read More »

विक्रांत पाटील भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणी जाहीर मुंबई : प्रतिनिधीभाजपच्या राज्यातील कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 3) केली. यामध्ये 12 उपाध्यक्ष, पाच महामंत्री यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. याशिवाय आमदार आशिष शेलार व माधुरी मिसाळ विधानसभेत मुख्य प्रतोद असतील. दरम्यान, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडमधील नेत्या उमा खापरे, …

Read More »

नेरळमध्ये डॉक्टरला पुन्हा कोरोनाची लागण

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथील डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. याआधी गेल्याच महिन्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोनाग्रस्त तरुणाला तपासल्याने नेरळ खांडा येथील खासगी डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. 13 जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या 45 वर्षीय खासगी …

Read More »

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या काही काळात विस्तारवादाने मानवतेचा विनाश केला, मात्र आता विस्तारवादाचे युग संपले असून, जग विकासाकडे वाटचाल करीत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 3) अचानक लडाखचा दौरा …

Read More »

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी (दि. 3) पहाटे मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून …

Read More »

वरुणराजाचे पुनरागमन; बळीराजा सुखावला

पनवेल : रामप्रहर वृत्तगेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे हवेत गारवा आला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या जीवांना हायसे वाटले आहे. विशेष म्हणजे वरुणराजाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली होती, …

Read More »