Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरणमधील बाळाची कोरोनावर मात

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील जासई येथील 18 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. हे बाळ आजारी असल्याने त्याला 12 एप्रिल रोजी जासई येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. …

Read More »

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई

33 गावे आणि 148 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा   अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट नसले तरी पाणीटंचाईची समस्या मात्र जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांतील एकूण 33 गावे आणि 148 वाड्यांना  जिल्हा प्रशासनाकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पेण तालुक्यातील 10 गावे आणि 74 …

Read More »

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या नवी मुंबईतील खारघर येथील 810 घरांसाठी दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी …

Read More »

लॉकडाऊनमुळे वाहनांचा ताबा मिळण्यास अडचणी

पोलादपूर : प्रतिनिधी – गेल्या गुढीपाडव्यासह रविवारचा अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त चुकल्याने वाहनखरेदी करण्यासाठी अनेक मध्यमवर्गीयांसह श्रमजीवींनी केलेल्या कोटयवधी रूपयांच्या गुंतवणुकीबाबत लॉकडाऊनमधून कोणताही पर्याय निघाला नसल्याने या गुंतवणुकीसह गुंतवणुकदारांचेही भवितव्य अंधारात आले आहे. हे दोन्ही मुहूर्त टळल्यानंतरही वाहन खरेदीबाबतच्या कोणत्याही व्यवसाय आस्थापनांना लॉकडाऊनमधून मुभा न मिळाल्याने वर्क फ्रॉम होम करणार्‍या या …

Read More »

शाळा बंद…ऑनलाइन शिक्षण सुरू!

पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्च पासून शाळा बंद झाल्या. परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. त्यातच टाळेबंदीची मुदत वाढत आहे हे पहाता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू झाला. त्यानुसार सुधागड तालुक्यातील राजिप नेणवली शाळेत देखील …

Read More »

मुंबईला जाणार्यांचे प्रवास थांबवावेत

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक मुंबई येथे कामास्तव जाणार्‍या लोकांचे प्रवास थांबविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात …

Read More »

आसूडगावात जनता कर्फ्यूला प्रतिसाद

कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या परिसराला लागून असलेल्या आसूडगाव परिसरात कोरोनोचा शिरकाव होवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आसुडगाव परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्वयंस्फुर्तीने दि. 24, 25, 26 एप्रिलला जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्याला सर्व जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पनवेल परिसरातील गरजूंना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व मजुर काही झोपडपट्ट्यांमध्ये तर काहीजण भाड्याने राहतात. संचारबंदी व जिल्हा बंदी असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे सर्वच जण बेरोजगार होऊन घरी बसुन आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …

Read More »

पनवेलमध्ये खोटी हजेरी लावणारा सफाई कामगार निलंबित

38 कर्मचार्‍यांना शिस्तभंगाची नोटीस पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेने खोट्या हजेरी लावणार्‍या सफाई कामगाराला निलंबित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामात हलगर्जीपणा करणार्‍या 14 कंत्राटी कर्मचारी,  चार वाहन चालक आणि 20 शिक्षक कर्मचार्‍यांना शिस्तभंगाच्या नोटीसा दिल्या असून अजून काही अनुपस्थितांना त्यांच्या विभागातून माहिती घेऊन शिस्तभंगाची नोटीस देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे …

Read More »

उपजीविकांवर भर हवाच

एकीकडे कोरोनाच्या आणखी फैलावाची भीती आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा फटका व जवळपास 40 कोटी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधण्याची जबाबदारी केंद्र सरकारला पार पाडायची आहे. हे आव्हान सोपे अजिबातच नाही. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा सोमवारपासून सुरू झाला. खरंतर याच्याही आधीपासून सर्वसामान्यांचे …

Read More »