Breaking News

महत्वाच्या बातम्या

जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हाच आपला उद्देश असून, जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी यांनी माजी आमदार विवेक पाटील आणि तत्कालीन आमदार मनोहर भोईर यांचा पराभव केला. त्यानंतर आमदार बालदी …

Read More »

खालापूरमध्ये बिबट्याचे दर्शन

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील नावंढे गावात सोमवारी (दि. 11) बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली असून, वनविभागाचे पथक तेथे तळ ठोकून आहे. नावंढे गावातून केळवली रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर सोमवारी सकाळी 10.30च्या सुमारास रवी हाडप यांना बिबट्याचे दर्शन झाले.बिबट्याला चाहूल लागल्यावर त्याने गवतात धूम ठोकली. बिबट्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांत घबराट …

Read More »

72 वर्षांच्या ओढीची अखेर

ज्या ठिकाणी गुरू नानक यांची प्राणज्योत मालवली होती, त्या ठिकाणी पुढे ‘कर्तारपूर साहिब गुरुद्वारा’ उभारण्यात आला. परंतु फाळणीत तो भाग पाकिस्तानात गेल्याने शीख धर्मियांना तेथे जाऊन दर्शन घेणे सोपे राहिले नाही. अखेर 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रथमच चर्चा झाली. दिल्ली-लाहोर बस …

Read More »

आध्यात्मिकतेद्वारे जीवन परिवर्तन

धर्म समाजातील सर्व वर्गांमध्ये आध्यात्मिक जागृती, नैतिकता आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्थापित करण्याचे साधन आहे, परंतु दुर्दैवाने आज धर्माला जोडण्याऐवजी तोडण्याचे साधन बनविण्यात आले आहे. परिणामी धर्म समाजाच्या विकासामध्ये बाधक ठरल्याचे चित्र दिसत आहे. आज आवश्यकता आहे ती एका अहिंसात्मक आध्यात्मिक क्रांतीची, जी मानवामध्ये निहित उच्च मानवी मूल्ये जागृत करू शकेल. …

Read More »

395 हेक्टर भातशेतीचे पंचनामे पूर्ण उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची माहिती

उरण : प्रतिनिधी भाताचे कोठार संबोधिले जाणार्‍या उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे, विंधणे, टाकीगाव, धाकटी जुई, बोरखार, चिरनेर, रानसई, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली विभागतील खोपटे, पिरकोन, वशेणी, पुनाडे, केळवणे, आवरे यासह चाणजे विभागातील करंजा, केगाव, नागाव आदी गावांतील महसुली गावातील 1194 शेतकर्‍यांच्या सुमारे 395.87 हेक्टर जमिनीच्या भातशेतीचे पंचनामे …

Read More »

गोड्या पाण्यातील चिंबोर्‍यांना वाढती मागणी

मोहोपाडा : वार्ताहर दांड-रसायनी रस्त्यावरील रिस टाटापॉवर हाऊसजवळ आसपासच्या परिसरातील आदिवासी महिला गोड्या चिंबोर्‍यांची विक्री करण्याकरिता बसत आहेत. पावसाचे प्रमाण कमी होऊन धुके पडण्यास सुरुवात झाल्याने नदीकिनारी, ओहोळ, तसेच शेतात आणि डोंगर कपारीत सापडणार्‍या गोड्या पाण्यातील चिंबोर्‍यांची विक्री करण्याकरिता बसत आहेत. पौष्टिक आणि चविष्ट अशा गोड्या पाण्यातील चिंबोर्‍या म्हणजे खवय्यांच्या …

Read More »

कामोठ्यामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी, ईदच्या धार्मिक रॅलीमधून मुस्लिम बांधवांनी दिला शांतता आणि एकतेचा संदेश

पनवेल : प्रतिनिधी कामोठे येथे सुन्नी गौसीया चिश्तीया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ईद मिलादुन्नबी (मोहम्मद पैगंम्बर) जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ट्रस्टच्या वतीने जयंतीनिमित्त नूर-ए-मोहम्मदी मदरसा (शाळा) या विद्यार्थ्यांना स्कूल युनिफॉर्मचे मोफत वाटप करून मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत राष्ट्रध्वज फडकल्याने कामोठा परिसरात या रॅलीचे मोठ्या प्रमाणात …

Read More »

रोटरी क्लबच्या वतीने नाट्यसंगीत स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल मेट्रो यांच्या वतीने एम. जी. जोशी मास्तर स्मृती खुल्या नाट्यसंगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील चिंतामणी सभागृहामधे झालेल्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याचबरोबर रसिकांनाही दर्जेदार नाट्यगीत श्रवणाचा आनंद मिळाला. अत्यंत श्रवणीय व रंगतदार अशा या स्पर्धेमध्ये नेहा पुरोहित हिने …

Read More »

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमिक विद्यालयाने अत्यंत नेत्रदीपक यश प्राप्त केले. सीकेटीचे 38 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये कौशल मनोज गोसावी (पाचवी), ऋतुजा नरेंद्र म्हात्रे (पाचवी), ऋत्विक शिवदास पाटील (पाचवी), प्रचिती संतोष घोलप (पाचवी), …

Read More »

नेमबाजांची कमाल; टोकियो ऑलिम्पिकमध्ये 15 जागा निश्चित

दोहा : वृत्तसंस्था दोहा येथे सुरू असलेल्या 14व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत अंगद वीर सिंह बाजवा आणि मायराज अहमद खान यांनी स्किट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले. नेमबाजांनी केलेल्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने …

Read More »