ट्वेन्टी-20 मालिकेत बांगलादेशवर मात नागपूर : प्रतिनिधी बांगलादेशविरुद्धच्या दीपक चहरने घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने तिसरा आणि अंतिम ट्वेन्टी-20 सामना जिंकला आणि मालिकाही 2-1 अशी जिंकली. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने अवघ्या सात धावा …
Read More »कळंबोली सर्कलला जुगाराचा विळखा
कळंबोली : बातमीदार कळंबोली सर्कलच्या बाजूला असलेल्या कळंबोली वाहतूक पोलीस कार्यालयाच्या बाजूलाच जुगाराचा अड्डा रोज सकाळी 8 वाजल्यापासून मांडला जात आहे. या जुगार अड्ड्यावर माथाडी कामगार, तसेच अन्य कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. प्रथमदर्शनी जुगार खेळताना जिंकण्याचे आमिष दाखवून नंतर कंगाल करण्याचा अनोखा प्रकार केला जात आहे, मात्र …
Read More »विकासपूर्व कामे अंतिम टप्प्यात, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचा विश्वास
पनवेल : बातमीदार सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या अगोदर करावयाची विकासपूर्व कामे अजून सुरूच आहेत. यात सर्वधिक महत्त्वाचे असलेले टेकडी सपाटीकरण, नदीचा प्रवाह बदलणे आणि दहा गावांचे स्थलांतर करून ती जागा मिळवून देणे ही कामे आता अंतिम टप्प्यात असून, या वर्षीच्या डिसेंबरअखेर …
Read More »पायी दिंडीचे धाकटी पंढरीला प्रयाण
मोहोपाडा : वार्ताहर श्री विठ्ठल पायी कोकण दिंडी आयोजित स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कांबेकर महाराज, सुखनिवासी गोमाजीबाबा गायकर, सुखनिवासी भगोजीबाबा, सुखनिवासी झिपरूबाबा, सुखनिवासी गणपतबाबा मुकादम, गुरुवर्य लक्ष्मण महाराज म्हसकर आणि गणेश सर यांच्या कृपाशीर्वादाने साजगाव येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. शिवव्याख्याते कीर्तनकार हभप संतोष महाराज सते यांच्या कुशल मार्गदर्शनाने भाताण …
Read More »पोदी भागातील भुयारी मार्ग रखडला, महावितरणच्या टॉवरमुळे डिसेंबर 2017 पासून काम बंद
पनवेल : बातमीदार पनवेल रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पोदीवर जाण्यासाठी फाटकामधून जाणे, अजून तरी टळण्याची चिन्हे नाहीत. त्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. महावितरणची वीजवाहिनी काढण्यास विलंब झाल्यामुळे हे काम रखडले आहे. नवीन पनवेल सेक्टर 15, 15 ए, 16, तसेच पोदी आणि विचुंबे गाव या भागात पनवेलकडून वाहने घेऊन …
Read More »भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, आघाडीसोबत जाणार्या शिवसेनेला शुभेच्छा! -चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी सत्तास्थापनेसंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर …
Read More »चक्रीवादळांमुळे रायगड जिल्ह्यातील 22,677 हेक्टर भातशेतीचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील 22 हजार 677 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. एक हजार 701 गावांतील 67 हजार 51 शेतकर्यांना याचा फटका बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला …
Read More »दर नियंत्रणासाठी सरकार करणार कांद्याची आयात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कांद्याचे गगनाला भिडलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय शनिवारी (दि. 9) घेतला. दिल्लीसह अनेक ठिकाणी कांद्याचे भाव 100 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर देशांतून पुरेसा कांदा आयात करण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात सरकारने स्पष्ट …
Read More »राम मंदिरासाठी 250 शिल्पकारांची गरज
अयोध्या : वृत्तसंस्था रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल. या निकालाच्या निर्णयाची प्रतीक्षा असलेल्या विश्व हिंदू परिषदेने मंदिराचा आराखडा आधीच तयार करून ठेवला आहे. राम मंदिर निर्मितीच्या कार्यशाळेशी …
Read More »प्रवासी
एका कार्यक्रमासाठी झारखंडमध्ये जाण्याचा योग आला. देशातील मागासलेल्या बिहार राज्याचे विभाजन करून झारखंडची निर्मिती करण्यात आली. राजधानी रांचीमध्ये नवीन विधान भवन, मंत्रालय आणि शहराची उभारणी सुरू आहे. शहराच्या भोवती रिंग रोड आहे. आपल्या सारखाच पाऊस असूनही रस्ते चांगल्या अवस्थेत आहेत. रांची शहारामध्ये शेअर रिक्षा जास्त चालतात. त्यांची हद्द ठरलेली असते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper