Breaking News

महत्वाच्या बातम्या

गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

शिवाजीनगर, गव्हाण : गेली सहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

Read More »

उरणमधील पुरातन श्रीगणेश मंदिर

उरण : वार्ताहर उरण शहरातील गणपती चौक येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री गणपती मंदिर हे सर्व गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर सुमारे 250 वर्षे पुरातन असून मंदिराच्या प्रवेशद्वारी आणि गाभार्‍यामध्ये पुरातन लाकडाच्या कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. मंदिरातील सुंदर सुबक आणि कोरीव काळ्या पाषाणातून घडवलेली रिद्धी-सिद्धीसह असलेली श्रीगणेशाची मूर्ती …

Read More »

मुसळधार पावसाचे गडचिरोलीत थैमान; 300 गावांचा संपर्क तुटला; तिघे वाहून गेले

गडचिरोली : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक मार्ग बंद पडून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान-मोठे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख …

Read More »

विसर्जन घाटावर भाविकांचे भक्तिभावाने स्वागत

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शनिवारी (दि. 7) सगळीकडे पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिभावाने विसर्जन झाले. नवीन पनवेल सुकापूर येथील तलावातही परिसरातील अनेक गणपतींचे विसर्जन झाले. या वेळी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल, तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणपती विसर्जन घाटावर भाविकांचे स्वागत करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार …

Read More »

चांद्रयान-2; विक्रम लँडरचे ठिकाण सापडले

बंगळुरू : वृत्तसंस्था चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) यश आले आहे. ‘चंद्रावरील विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून, ऑर्बिटरने या लँडरचे फोटो काढले आहेत. आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करीत आहोत’, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान-2 …

Read More »

उरण नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी चोख व्यवस्था

उरण : वार्ताहर माहेरपणाला आलेल्या गौरी आणि लाडक्या गणपती बाप्पांचे शनिवारी (दि. 7) उरण शहरासह ग्रामीण भागात विसर्जन करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषदेने चोख व्यवस्था ठेवली होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त गणरायाचे मोठ्या उत्साहात व आनंदात ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाने दमदार हजेरी लावली होती, तरीही भक्तांनी …

Read More »

भामरागडला पुराचा वेढा

तिघे वाहून गेले; 300 गावांचा संपर्क तुटला गडचिरोली ः प्रतिनिधी पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. 70 टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे 300 गावांचा दोन …

Read More »

‘होमगार्डमध्ये सामील व्हा’

म्हसळा ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरूड, महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली या तालुक्यातून होमगार्ड पथकांत भरती प्रक्रिया दि. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत सुरू आहे. तरी आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे …

Read More »

शेतकरी वसंत भोसले यांची सामाजिक बांधिलकी

नागोठणे : प्रतिनिधी रोहे तालुक्यातील बाळसई गावचे शेतकरी वसंत भोसले यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले वसंत भोसले हे गेली 25 वर्षे गावातील विविध कार्यक्रमांत मोफत जेवण आणि शेतात राबून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून …

Read More »

वाहतूक कोेंडीचे विघ्न

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बिकट माणगाव : प्रतिनिधी कोकणवासीयांचे आराध्य दैवत गणपतीला शनिवारी भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभ्ाूमीकडे निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकरमानी प्रवासी तासन्तास या महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडीला तोंड देत होते. त्यामुळे चाकरमान्यांच्या वाट्याला …

Read More »