Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जतमध्ये ‘सही पोषण, देश रोशन’ अभियान सुरु

कर्जत : बातमीदार येथील महिला बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 1) कर्जत पंचायत समिती कार्यालयात उपसभापती काशिनाथ मिरकुटे यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या ‘सही पोषण, देश रोशन‘ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम राबवून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. …

Read More »

परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज

ग्रुप बुकिंगची सुविधा, महाड आगारातून 70 बसेसचे बुकिंग महाड : प्रतिनिधी गणेशोत्सवाकरिता कोकणात आलेल्या गणेशभक्तांसाठी परतीचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत 70 एसटी बसेस बुक केल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी परतीच्या प्रवासापूर्वी दोन दिवस आधीच …

Read More »

भिवपुरी रेल्वेस्थानकाजवळ एक मार्गिका पाण्याखाली

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात प्रवाशांना येण्यासाठी असलेला रस्ता आणि मुंबईकडे जाणारी एक मार्गिका पाण्याखाली गेली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवपुरी रोड स्टेशनमध्ये जाणे कठीण होऊन बसले आहे. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या कर्जत एन्डकडे डिकसळ हे गाव रेल्वे मार्गाला लागून आहे. त्यापुढे अनेक गावे असून, तेथील …

Read More »

नागोठण्यात पुन्हा पूर

दरड पडल्याने भिसे खिंडीतील रस्ता; तसेच नागोठणे रोहे रेल्वे मार्ग ठप्प नागोठणे : प्रतिनिधी मंगळवारी सायंकाळपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने आपले पात्र सोडून शहरात प्रवेश केल्याने नागोठण्यात दुपारपर्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी दुपारपर्यंत पुराने नागोठणे बाजारपेठ, तसेच कोळीवाडा, बंगलेआळी, शिवाजी चौक व्यापून गेला होता. दरम्यान, ग्रामपंचायत, …

Read More »

खोपोलीतील जनजीवन विस्कळीत; पाताळगंगेला पूर

सावरोली पुलावर पाणी खोपोली : प्रतिनिधी खोपोली-खालापूर परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे खोपोली -कर्जत व मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली. महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी भरल्याने पनवेल-खोपोली, खोपोली-पाली वाहतूक विस्कळीत झाली. राष्ट्रीय महामार्ग व एक्स्प्रेस वेला जोडणार्‍या सावरोली पुलावर पाताळगंगा नदीचे पाणी आल्याने येथील वाहतूकही काही काळ …

Read More »

रायगड जिल्ह्यात पाऊस धुवांधार

सुधागड जलमय; अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी पाली ़: प्रतिनिधी सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 4) अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली आंबा नदी पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले, तसेच जांभूळपाडा आंबा नदी पुलालादेखील पाण्याने वेढा दिला.त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बुधवारी बंद ठेवण्यात आली …

Read More »

विदर्भ मराठवाड्याची तहान भागविणे; हे तर कोकणचे भाग्य

कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन, कोकणी माणूस फणसाप्रमाणे राकट, तर हापूससारखा गोड, हा या मातीचाच गुणधर्म. अनेक साहित्यिक, विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी अशी अनेक नररत्ने या मातीने महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले स्वराज्य आणि स्वराज्याची राजधानी राष्ट्राला दिली. याच कोकणाने महाराष्ट्राला कोयनेची वीज दिली. आपले अस्तित्व संपवून जसे भगवंत शंकराने सृष्टीचे रक्षण …

Read More »

जागरुकतेची गरज

ज्वलनशील रसायनांची गळती झाल्यास तातडीने ती हुडकण्याची यंत्रणा या प्रकल्पात आहे का, तसेच तेथे ऑटोमॅटिक फायर स्प्रिंकलर देखील आहेत का, अशी विचारणा होते आहे. अर्थातच अशी यंत्रणा प्रकल्पात असावी, परंतु मंगळवारच्या दुर्घटनेनंतर ती कार्यान्वित का झाली नाही याची चौकशी होण्याची गरज आहे. ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या उरण …

Read More »

पनवेल, उरणमध्ये दुसर्यांदा पूरस्थिती

मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले पनवेल : वार्ताहर गेल्या 48 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गणपती बाप्पासुद्धा पाण्यामध्येच बसविल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या …

Read More »

महेश बालदी जिंकणारच -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त 2014च्या निवडणुकीवेळी महेश बालदी नवखे होते.  बूथवर त्या वेळी कार्यकर्तेही नव्हते, पण निवडणुकीतील पराभवानंतर आमदार असल्यासारखे ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रत्येक गावात ते पोहोचले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांना नावाने ओळखतो. पक्षाची ताकद मतदारसंघात वाढली आहे. 500 कोटींची विकासकामे त्यांनी केली आहेत. या वेळी …

Read More »