मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षित रहावे, यासाठी विहूर ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करुन जंगल परिसरात वाढलेली झुडपे, सुके गवत, झाडाच्या सुक्या फांद्या, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षीत रहावे, अभयारण्यातील वृक्ष, वन्यजीव, पक्षी यांचे अस्तित्व व सुरक्षितता टिकून रहावी यासाठी …
Read More »सुधागडात कडधान्ये पिकाला साड्यांच्या कुंपणाचे संरक्षण
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. पाली-खोपोली मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात साड्यांचे कुंपण लावलेली शेती आढळते. पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे …
Read More »एक्स्प्रेस वेवरून टँकर कोसळला
दोन जण किरकोळ जखमी खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्यामुळे मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाणारा टँकर शुक्रवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास 50 फूट खाली जुन्या महामार्गावर कोसळला. सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बचावले असून, ते किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईकडे चाललेला टँकर बोरघाटातील दत्तवाडीजवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. …
Read More »लोखंडी प्लेट तुटल्याने बंधार्यातील पाणी गेले वाहून
कर्जत बोरगाव येथील शेतकरी हवालदिल कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोश्री नदीवरील बोरगाव येथे याच वर्षी बांधलेल्या सिमेंट बंधार्यात भरपूर पाणी साठले होते, मात्र त्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट गुरुवारी (दि. 13) रात्री तुटल्या आणि बंधार्यातील सर्व पाणी वाहून गेले. या बंधार्याच्या पाण्यावर किमान 50 एकर जमिनीवर भाजीपाला शेती केली आहे. त्या …
Read More »आठ आसनी चारचाकी वाहनांत आता सहा एअरबॅग अनिवार्य : नितीन गडकरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 14) मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची माहिती ना. गडकरी यांनी दिली. आपल्या ट्विटमध्ये मंत्री गडकरी म्हटले आहे की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये किमान सहा …
Read More »डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक; ज्येष्ठ डॉ. गोविंद गुणे यांचे निधन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे यांचे वडील आणि ज्येष्ठ डॉ. गोविंद रंगनाथ गुणे यांचे गुरुवारी (दि. 13) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. कोरोना निर्बंध असल्याने मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत उत्तररात्री अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णसेवा हा व्यवसाय नसून …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे
शनिवारी मान्यवरांच्या हस्ते होणार शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक येथे वैद्यकीय सामुग्री व रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत मोहपे येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शनिवारी (दि. 15) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »पनवेल मनपा मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक
समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रमांबाबत चर्चा पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक शुक्रवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली होती. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातझालेल्या या बैठकीत मागासवगीर्र्य समाजाच्या कायमस्वरूपी उन्नतीसाठी विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये मागासवर्गीय कल्याण समितीची …
Read More »उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्याला गेले 70 दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुरुवारी कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. …
Read More »उद्धव ठाकरेसाहेब, स्वेच्छामरण द्या!
बडतर्फ एसटी कर्मचार्यांची विनंती विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम रत्नागिरी ः प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचार्यांनी राज्यभरात एसटी संप (दुखवटा) सुरूच ठेवला आहे. दुसरीकडे संपात सहभागी झालेल्या आणि वारंवार आवाहन करूनही मागे न हटणार्या कर्मचार्यांवर बडतर्फी अथवा निलंबनाची कारवाई केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील कर्मचार्यांवरही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper