Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सायकल रॅलीला पनवेलमध्ये प्रतिसाद; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छतेचा संदेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील इन्फिनिटी फाऊंडेशन, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत आणि नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्दिष्ट स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल …

Read More »

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन साधेपणाने साजरा

उरण, चिरनेर ः प्रतिनिधीदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गाजलेल्या 25 सप्टेंबर 1930च्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतीदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने झाला. या वेळी पोलिसांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली.चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), …

Read More »

सीकेटीमध्ये एनएसएस स्थापना दिन आणि कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) 52वा वर्धापन दिन व पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11.30 वाजता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आभासी माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाला विकासाची दिशाळे देशाला विकासाची दिशा

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तकाँग्रेसच्या काळात योजना बारगळायच्या, तर मोदी सरकारमुळे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार व वनेमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी शनिवारी (दि. 25) येथे केले. पंडित …

Read More »

‘केएलई’च्या विद्यार्थ्यांनी केली रोडपाली तलाव परिसराची स्वच्छता

पनवेल : वार्ताहर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत त्याचबरोबर विविध उपक्रमांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून श्रमसंस्कार केले जातात. या माध्यमातून श्रमाचे महत्त्व एक प्रकारे पटवून दिले जाते. दरम्यान, याच उद्देशाने कळंबोलीतील केएलई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रोडपाली तलावालगत स्वच्छता अभियान घेतले. महापालिकेच्या सहकार्याने त्यांनी परिसर स्वच्छ केला. आजादी का अमृत महोत्सव या …

Read More »

जाधव कुटुंबीयांना वीज मंडळाकडून मदत

मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव (वय 40) याचा वीज पोलवरून पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना वीजमंडळाकडून पाच लाख रोख रक्कम आर्थिक मदत म्हणून गुरुवारी (दि. 23) सायंकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आली. वीजमंडळाचे कंत्राटी कामगार भालचंद्र जाधव हे मोहोपाडा बाजारपेठ रस्त्यावरील गणेश गीध यांच्या दुकानासमोरील …

Read More »

चिरनेेर जंगल सत्याग्रहाचा आज 91वा स्मृतिदिन

चिरनेर : प्रतिनिधीउरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. 1930च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने चिरनेर येथे दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी अभिवादन करण्यात येते. चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि नवी मुंबई पोलीस यांच्या …

Read More »

दाखले वाटप शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (दि. 24) कळंबोली येथील …

Read More »

पनवेल मनपातर्फे महिलांसाठी विशेष प्रशिक्षण योजना

पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेतर्फे महिला बालकल्याण विभागांतर्गत प्रशिक्षण आणि मुलींसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षणांतर्गत महिलांना व मुलींना शिवणकाम, ब्युटिशन, फॅन्सी बॅग, पेपरच्या पिशव्या तयार करणे, बेकिंग प्रॉडक्ट, केक तयार करणे असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणार्‍या मुलींना …

Read More »

अनंत गीते भंगारात काढलेले नेते; राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांची खरमरीत टीका

कळंबोली : बातमीदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यावर जर कोणी गरळ ओकत असेल, तर ते पक्ष कदापि सहन करणार नाही. अनंत गीते हे शिवसेनेने भंगारात काढलेले नेते असून ते दोन वर्ष  विजनवासात होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी कळंबोली येथे गुरुवारी (दि. …

Read More »