Breaking News

Ramprahar News Team

रावे मोराकोठा पाणी योजना मंजूर ; राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निधीची तरतूद

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील रावे ग्रामपंचायत हद्दीतल रावे मोराकोठा पाणी योजनेला मंजूरी मिळाली असून, या योजनेसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, मंत्रालयात झालेल्या बैठकीत रावे मोराकोठा पाणी योजनेच्या मंजुरीचे पत्र आमदार निरंजन …

Read More »

माणगावात हाणामारीत दोन जण जखमी

माणगांव : प्रतिनिधी शहरातील महाराणा प्रताप नगरात मंगळवारी (दि. 11)  दुपारी जोरदार हाणामारी झाली. त्यात एका अल्पवयीन मुलासह एक महिला जखमी झाली. या प्रकरणी सहा जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी सरिता चव्हाण या पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या दिराचा मुलगा रोहन राजू चव्हाण अंथरुणावर झोपला …

Read More »

पेण रेल्वे स्थानक मार्ग वाहतुकीसाठी बंद

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरून पेण शहरात जाणार्‍या मार्गावर करण्यात येत असलेल्या कामामुळे तेथून पेण शहरात जाणारी ‘एन्ट्री’ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना तरणखोप बायपास मार्गे पेण-खोपोली मार्गावरून पेण शहरात यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रूंदीकरण करण्यात येत आहे. या महामार्गावरील रामवाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या  …

Read More »

चेंढरेतील भालकर परिवार भाजपत

अलिबाग : प्रतिनिधी शहराच्या वेशीवर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायतीची सर्वत्रिक निवडणूक 23 जून रोजी होत आहे. भाजप व मित्रपक्षाच्या आघाडीला चेंढरेमध्ये मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  चेंढरे ग्रामपंचयात हद्दीमधील रोहिदासनगर येथील भालकर परिवाराने गुरुवारी (दि.13) भाजपत प्रवेश केला. अलिबाग येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटखानी कार्यक्रमात अविनाश भालकर, विनोद भालकर, …

Read More »

कलोते धरणपात्रात धनिकांचे अतिक्रमण ; पाटबंधारे विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण पात्रात धनिकांनी अतिक्रमण करून बांधलेले बंगलो फार्महाऊस आणि धोकादायक नौकानयन याकडे पाटबंधारे विभागाचा कानाडोळा होत असून, धरणासाठी जमिनी दिलेला शेतकरी मात्र उपरा झाला आहे. खालापूर तालुक्यातील चार महत्वाच्या धरणापैकी कलोते मोकाशी धरण दुसर्‍या क्रमांकाचे मोठे धरण आहे. खालापूर तालुक्याची सिंचनाची गरज भागविता …

Read More »

जिल्ह्यात महिला अत्याचारांत वाढ ही चिंतेची बाब

रायगड जिल्हाची महाराष्ट्रातील औद्योगिक जिल्हा म्हणून आता ओळख झाली आहे. या जिल्ह्यात औद्योगिकरण होत आहे. त्याचबरोबर शहरीकरणदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रगतीबरोबरच काही समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे गुन्हेगारी. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातही महिलांवर होणार्‍या अत्याचारांत दरवर्षी वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. …

Read More »

सुटकेचा नि:श्वास

अरबी समुद्रातील चक्रीवादळांनी तुलनेने कमी हानी होते. परंतु तरीही या स्वरुपाची नैसर्गिक आपत्ती वारंवार येत असल्यामुळे त्यादृष्टीने सज्जता राखणे व काळानुरुप त्यात अधिकाधिक चांगले बदल करत राहणे जबाबदार प्रशासनाकडून अपेक्षितच आहे. भारताला लाभलेली 7600 किमीची मोठी किनारपट्टी लक्षात घेता हे आव्हान सोपे नाही. वायु चक्रीवादळाने दिशा बदलल्याची बातमी गुरुवारी दुपारपर्यंत …

Read More »

नेरळ धरण झाले गाळमुक्त, माती व दगड बाहेर काढण्यात यश

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन धरणातून तब्बल दहा वर्षानंतर गाळ काढण्यात येत आहे. या धरणातून आतापर्यंत किमान 900 ट्रक गाळ काढण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात दगडही बाहेर काढले आहेत. त्यामुळे धरणातील पाणी साठा अधिक होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्ब्ल दोन ठिकाणी गार्डन …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस धोक्याचे

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस धोक्याचे आहेत. अरबी समुद्रात खोलवर निर्माण झालेले वायू चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी कोकण किनारपट्टीवरील धोका कमी झालेला नाही. त्यामुळे रासगड जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनार्‍या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  बुधवारी (दि. 12) दुपारी 12 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. पावसाबरोबर जोरदार वारे …

Read More »

उरण तालुक्यातील दमदार पावसाने बळीराजा सुखावला

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागील महिनाभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला असून, यंदा पावसाचे आगमन वेळेत झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तर झाडे-वेली आनंदाने डोलू लागल्या असून अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पशू-पक्षी आणि वन्य जीवांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या …

Read More »