Breaking News

Ramprahar News Team

महाडमध्ये गाळे रिकामे, दुकाने थाटली रस्त्यावर; वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास

महाड : प्रतिनिधी योग्य नियोजनाअभावी महाड बाजारपेठेत होणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक आणि येणार्‍या पर्यटकांना त्रास होत आहे. शहरातील दुकानदार तसेच भाजी व फळ विक्रेते आपला माल नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचार्‍यांनाही त्रास होताना दिसत आहे. महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. तालुक्यासह …

Read More »

चित्राताई वाघ रविवारी खोपोलीत

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ रविवारी (दि. 27) खोपोली येत आहेत, त्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 21) सायंकाळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्वीनीताई पाटील यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक घेण्यात आली. भाजप खोपोली मंडल प्रभारी सुनील घरत यांनी नियोजन बैठकीत …

Read More »

पेण गणपतीवाडी येथील मुख्य रस्त्याचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यात वेगवेगळी विकासकामे केली जात आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा अशा योजना राबवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांच्या पुढाकाराने …

Read More »

आचंद्र-सूर्य शिवप्रभूच!

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आल्या दिवसापासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यांत सलत होते व आहेत. माननीय राज्यपालांच्या भाषणातील कुठल्या तरी वाक्याची मोडतोड करायची आणि पराचा कावळा करून राज्यपालांच्या विरोधात काहूर उठवायचे हा महाविकास आघाडीचा जुना खेळ आहे आणि त्याचे प्रत्यंतर सध्या पुन्हा एकदा येते आहे. जनमताचा बेमुर्वतपणे अपमान करून …

Read More »

ग्रामीण भागात निवडणुकीचा धुरळा

-समाधान पाटील, पनवेल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022मध्ये मुदत संपणार्‍या 7751 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 540 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापू लागले आहे. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आता दुसर्‍या टप्प्यात 7751 …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी विविध सामाजिक उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी 9 वाजता गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रम, 10 वाजता …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली पनवेल मनपा क्षेत्रातील विकासकामांची पाहणी

समस्या जाणून घेत नागरिकांशी साधला संवाद पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या तसेच येत्या काळात होणार्‍या कामांसंदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 21) पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला तसेच कामांसंदर्भात महापालिकेच्या अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. …

Read More »

कुटूंबवत्सल व्यक्तिमत्त्व -अरुणशेठ भगत

राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांना ग्लॅमर लाभलेले आहेत. कदाचित त्यामुळेच इतर क्षेत्र निवडण्यापेक्षा अधिक पसंती राजकारण, क्रिकेट आणि सिनेमाला दिली जाते. राजकारणात वलंयाकित जीवन जगता येते. क्रिकेटमध्येही पैसा आहे आणि जाहिरातींमध्येही हिर्‍यासारखे चमकत राहण्याची संधी लाभते. सिनेमात तर काय कॅमेर्‍याच्या सान्निध्यातच जीवन लखलखत असते… हे जितकं खरं तितकंच …

Read More »

विद्यार्थ्यांनी घेतली टपाल, बँकेच्या कामांची माहिती

सीकेटी विद्यालयातर्फे क्षेत्रभेटी नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय मराठी प्राथमिक विभागाच्या वतीने बुधवारी (दि. 16) इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस, व गुरुवारी (दि. 17) इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची अभ्युदय बँक नवीन पनवेल येथे क्षेत्रभेट देण्यात आली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसचे व्यवहार …

Read More »

भाजपच्या पाठपुराव्याने तळोजा सबवेची दुरुस्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाने केलेल्या पाठपुरावामुळ तळोजा येथील भुयारी मार्गात होणारी पाणी गळती थांबविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. तळोजा (पाचनंदनगर) वसाहतीचे प्रवेशद्वार भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोश केणी यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन …

Read More »