Breaking News

Ramprahar News Team

तळोजातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा

पनवेल ः वार्ताहर फुटलेल्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने तळोजा सेक्टर 11मधील काही सोसायटीधारकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. ऐन दिवाळीतच हा प्रकार घडल्याने रोष व्यक्त केला जात आहे. तळोजा सेक्टर 11मधील गणेश मंदिर, जय शक्ती, सुमोध सोसायटीलगत असलेल्या रस्त्यावरील मलनिःसारण वाहिन्या भरून रस्त्यावर वाहत आहेत. अशातच या परिसरात दूषित …

Read More »

अपुर्‍या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेकरांची होतेय गैरसोय

पनवेल ः वार्ताहर शहरापासून दूर आणि अपुर्‍या जागेतील टपाल कार्यालयामुळे कामोठेतील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे होईल, असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टपाल कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. कामोठेची लोकसंख्या तीन लाखांच्या घरात गेली आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. सेक्टर 5 येथे …

Read More »

सुटीच्या दिवशी विभागनिहाय हरकती सूचना स्वीकाराव्यात

भाजपचे महामंत्री विजय घाटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी विकास आराखडा प्रकाशित केला आहे. या प्रक्रियेनुसार सूचना आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत ठेवली आहे. सध्या हरकती सूचना स्वीकारण्याचा कालावधी समाप्त होत आला आहे. शेवटचे दोन दिवस उरले आहेत, …

Read More »

एपीएमसीच्या बाजार समित्यांचा होणार पुनर्विकास

संचालक मंडळाच्या हालाचाली सुरू; सल्लागारांची नियुक्ती नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून वाशीतील इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता 2005पासून धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या कांदा-बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याच्या निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने …

Read More »

दिवाळीतला काँग्रेसी किल्ला

लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवडून आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात रुजलेली हायकमांड संस्कृती कायमची संपवावी आणि अधिक सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची किमान अपेक्षा होती, परंतु पक्षाच्या सुकाणू समितीतील नावे पाहिली असता काँग्रेस पक्षात यापुढील काळातदेखील हायकमांडचेच वर्चस्व राहणार हेच स्पष्ट दिसते. गांधी घराण्याच्या पादुका अध्यक्ष पदाच्या खुर्चीत ठेवून …

Read More »

रायगडात घनकचरा व्यवस्थापन गरजेचे

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगात होत आहे. त्याचबरोबर नागरिकीकरणदेखील झापट्याने होत आहे. विशेषतः उत्तर रायगडात नागरिकरण वेगात होत आहे. त्यामुळे अनेक समस्यादेखील निर्माण होत आहेेत. औद्योगिकरणामुळे जल, वायू, ध्वनी प्रदुषण होतच आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाची समस्या जाणवू लागली आहे. घनकचर्‍याची समस्या ही रायगड जिल्ह्याची सर्वांत मोठी समस्या …

Read More »

मुरूडमध्ये पाच पाळीव जनावरांची कत्तल

पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात कत्तलखोरांचा पोबारा मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील गारंबी धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका झुडुपात गुरुवारी (दि. 27) पहाटे काही अज्ञात इसम पाच पाळीव जनावरांची कत्तल करीत असताना मुरूड पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते सर्व इसम एका इनोव्हा गाडीत पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी …

Read More »

माणगाव तालुक्यात हळदीची लागवड; अर्धा एकरात दहा टनाचे उद्दिष्ट

माणगाव : प्रतिनिधी लहरी पर्जन्यमानामुळे भातशेती धोक्यात आली असतानाच माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत केलेली जैविक हळदीची यशस्वी लागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे उत्पादन घेतले जाते, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी पावसामुळे भातशेती संकटात सापडत आहे. कापणीच्या हंगामात पाऊस …

Read More »

दिवाळी सुटीनिमित्त मुरूड जंजिर्‍याला पर्यटकांची पसंती

मुरूड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुटीमध्ये तालुक्यातील मुरूड, काशीद,  नांदगाव समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वीकेण्ड आणि दिवाळीची सलग पाच दिवस सुटी पडल्यापासून मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. मुरूड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारी मोठ्या …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पेणमध्ये आनंदाचा शिधा वाटप

पेण : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी चार शिधा जिन्नस मिळणार असून, त्याचा लाभ पात्र शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यातील बोरगाव येथे केले. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त …

Read More »