Breaking News

Ramprahar News Team

रायगडात परतीचा पाऊस

अलिबाग ः प्रतिनिधी नवरात्रीत विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (दि. 5) दुपारी रायगड जिल्ह्यात अचानक हजेरी लावली. या पावसाचा जोर प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात होता. परतीच्या पाऊसधारा बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला, मात्र पोटरीला आलेले भातपीक आणि त्याचबरोबर फुलोरा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या भातपिकाला काही प्रमाणात …

Read More »

पनवेलमध्ये आरएसएसचे दिमाखदार संचलन

पनवेल ः रामप्रहर वृत्त विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन करण्याची हिंदु धर्मात परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन केले जाते. 1925 साली दसर्‍याच्याच दिवशी संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे संघामध्ये दसर्‍याच्या पथसंचलनाला विशेष महत्त्व असते. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे पथसंचलन झाले नव्हते. त्यामुळे यंदा संघ स्वयंसेवकांमध्ये वेगळाच उत्साह …

Read More »

पनवेलमध्ये तब्बल 25 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसर्‍यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथील मैदानात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेलमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम झाला. मिडलक्लास सोसायटी मैदानातील झंकार नवरात्रोत्सवात दसर्‍यानिमित्त खास रामचरित्रावर आधारित रामलिलेचे नाट्यमय सादरीकरण …

Read More »

मविआचा विकासकामांच्या श्रेयावरून वाद चव्हाट्यावर;

इंदापूर विभागात राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे गट आमने सामने माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात विकासकामांच्या श्रेयावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव गटाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याची जोरदार चर्चा माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी अशा विविध कारणांमुळे शिवसेनेत गटबाजी होऊन शिवसेनेचा एक गट …

Read More »

जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा

नवरात्रोत्सवाची सांगता; मिरवणुकांमध्ये उत्साह अलिबाग ः प्रतिनिधी साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण पारंपरिक पद्धतीने सर्वत्र साजरा झाला, तसेच नऊ दिवस सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाचीही बुधवारी (दि. 5) सांगता झाली. कोरोनाच्या सावटामुळे दोन वर्षे असलेले निर्बंध आता उठल्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव आणि दसरा सण उत्साहात साजरा …

Read More »

तोंडरे येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त तोंडरे येथे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजर रायगड जिल्ह्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल तालुक्यात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय …

Read More »

भाजप हे शक्तीचे दुसरे रूप

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन माथेरानमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे सक्षम नेतृत्व आणि पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन माथेरानमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणात पनवेल महापालिकेचा राज्यात पाचवा, तर देशात 17वा क्रमांक

पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेत 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात राज्य पातळीवर 34 शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेने पाचवा, तर देश पातळीवर 382 शहरांमध्ये 17वा क्रमांक पटकाविला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे थ्री स्टार व हागणदारीमुक्त शहराचा ओडीएफ++ दर्जा प्राप्त झाला आहे. पनवेल महापालिकेने यंदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपल्या …

Read More »

अज्ञानी पर्यटक आणि उपेक्षित ठिकाणे

’केल्याने देशाटन’ हा एक कार्यक्रम आमच्या लहानपणी दुरदर्शनवर लागत असे. या कार्यक्रमात उपेक्षित असलेली पर्यटन स्थळे प्रकाशात आणली जात असत. पर्यटकांना काय वेगळ पहायला मिळेल आणि शिकायला मिळेल याचा चांगला उद्देश यातून साध्य व्हायचा, मात्र आजच्या चॅनलमधील स्पर्धा आणि मालिकांची लोकप्रियता पाहता असे कार्यक्रम मागे पडू लागले आहेत. त्यामुळे नवनवीन …

Read More »

यश स्वच्छ भारताचे

भारतावर सत्ता गाजवण्यासाठी आलेल्या परदेशी लोकांनी विशेषत: स्वच्छतेच्या संदर्भात भारतीयांचे वर्णन अतिशय वाईट शब्दांत केलेले ऐतिहासिक ग्रंथांमधून आढळून येते, परंतु यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. गेल्या पाऊणशे वर्षांत भारतीय समाजामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही धिम्या गतीने का होईना भारत प्रगत देशांच्या दिशेने वाटचाल करू लागला …

Read More »