माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील काळ नदी पुलाजवळ केरकचरा टाकण्यात येत होता. तो पावसात कुजून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने रिक्षा चालक, प्रवासी, नागरिक हैराण झाले होते. त्याबाबत बुधवारी (दि. 30) दै. रामप्रहर वृत्त प्रसिद्ध होताच माणगाव नगरपंचायतीला जाग आली. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नगरपंचायतीचे सफाई कामगार पाठवून सदरचा कचरा त्वरीत …
Read More »स्थानिकांना न्याय द्या; अन्यथा उपोषण; विळे भागाड ग्रामस्थांचा इशारा; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसीमधील पोस्को कंपनीतील भंगाराच्या मलिद्यासाठी बाहेरील पुढार्यांनी स्थानिकांच्या विरोधात गुंडगिरी चालू केली आहे, ती त्वरित थांबवून भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी विळे भागाड ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तीस वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यांतील विळे भागाड येथील जमीन कवडीमोल भावात संपादित करुन तेथे …
Read More »खालापुरातील विश्रामगृह दुरुस्तीवर उधळपट्टी; सार्वजनिक बांधकाम विभागाची मेहरनजर; कर्मचारी निवासांची मात्र दूरवस्था
खोपोली : प्रतिनिधी दुरूस्तीचे ग्रहण लागलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर होणारी उधळपट्टी थांबवा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापुर्वी विश्रामगृहावर थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेली होती. खालापूर शहरात 1984 साली महाराष्ट्र शासनाने विश्रामगृह इमारत बांधली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित विश्रामगृहाची …
Read More »रोह्यातील जि.प.च्या 50 शाळांची पडझड; 68 वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
रोहे : प्रतिनिधी चक्रीवादळात रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 50 शाळांमधील 77 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. सध्या कोरोना संसर्ग नसलेल्या गावांतील शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत, मात्र वर्गखोल्या नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे असा प्रश्न तालुक्यातील शिक्षकांना पडला आहे. रोहा तालुक्यात जि. प.च्या 237 …
Read More »महाडचे कुर्ला धरण ओव्हरफ्लो; परिसरातील खोदकामामुळे मातीचा गाळ वाढणार
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कुर्ला गावाजवळ असलेल्या धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा केला जातो. हे धरण आता तुडुंब भरून वाहू लागले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धरणाची दूरवस्था झाली आहे. भिंतीत रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्याने धरण धोक्याचे बनत असतानाच शेजारील खाजगी जागेत होत असलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात माती …
Read More »कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही; दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा
मुंबई ः प्रतिनिधी 100 कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे तसेच प्रत्येक चौकशीऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब …
Read More »नवी मुंबई पालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : प्रतिनिधी सीबीडी बेलापूर पामबीच मार्गालगत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा प्रधान सचिव …
Read More »पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव मात्र बंदिवासात!; भाजप नेते आमदार आशिष शेलार यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी येथे केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, …
Read More »जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का? -भातखळकर; धर्मांतर रॅकेट प्रकरणाच्या तपासावरून सवाल
मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर …
Read More »नगरसेवक विकास घरत यांनी सिडको प्रशासनाला फैलावर घेतल्यावर कामे सुरू
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणार्या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओथंबून वाहत आहेत. याची तक्रार करूनसुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले होते. रहिवाशांसह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकार्यांना फैलावर घेताच कामे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper