मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी विस्कळीत होत असल्याने संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाभारताचे दाखले द्यावे लागत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूसफूस, विसंवाद असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आघाडी करण्यामध्ये संजय राऊतांची महत्त्वाची भूमिका होती. आता …
Read More »विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची लेखी मागणी भाजपचे गणेश भगत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनातून केली आहे. नेरूळ नोडमधील प्रभाग 96 मध्ये सेक्टर 16 परिसरात सनहोम या गृहनिर्माण सोसायटीलगत आणि सनशाईन …
Read More »कोकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ सेवानिवृत्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विभागीय आयुक्त हे पद शेवटच्या माणसापर्यंत शासन योजना राबविण्याची सर्वात मोठी यंत्रणा आहे, असे मत विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले. बुधवारी (दि. 30) ते नियत वयोमानानुसार 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदावर कार्यरत असतांना कोविड-19च्या प्रादूर्भावाच्या …
Read More »भटके, विमुक्त जाती जमातींचे सर्वेक्षण करा; बबन बारगजे यांची राज्य सरकारकडे मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुरू केलेल्या अधिसूचित भटके, विमुक्त आणि अर्ध भटक्या जाती जमातींचे सर्वेक्षण महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजप भटके-विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. बारगजे …
Read More »तळोजा वसाहतीवर सीसीटीव्हीची नजर
पनवेल : वार्ताहर तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने फेज 1 आणि 2 मध्ये दीडशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर अखेरीस …
Read More »सलून व्यवसायाची घडी बसेना!; कमाईच्या वेळेवर निर्बंध; शनिवार-रविवारही जातोय वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निर्बंध शिथिल होताना केशकर्तनालये (सलून) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी या व्यवसायाला अद्याप स्थैर्य प्राप्त झालेले नाही. केशकर्तनालयात लोक शनिवार-रविवार या सुट्यांच्या दिवशी अधिक प्रमाणात जात असतात आणि नेमके त्याच दिवशी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्देश असल्याने परवानगी मिळूनही या व्यावसायिकांचा अर्थार्जनाचा प्रश्न सुटलेला …
Read More »माथेरानमधील डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवेत, कोरोना काळात ठरले देवदूत
कर्जत : बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्येसुद्धा जाणवला. मात्र तुटपुंजी आरोग्य व्यवस्था असताना येथील डॉक्टरांनी धीराने कोरोनाशी दोन हात करून रुग्णांना कोविड मुक्त केले. शासनाचे डॉ. प्रशांत यादव, डॉ. प्रांजल सिंग, नगर परिषदेचे डॉ. उदय तांबे या तिन्ही डॉक्टरांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. माथेरानच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये फक्त प्रथमोपचार …
Read More »उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांनी साकारल्या 412 परसबागा
अलिबाग : प्रतिनिधी महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणार्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद‘ च्या माध्यमातून 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात उमेद अभियानातून सामूहिक व वैयक्तिक स्वरुपात 412 परसबागांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये स्वयं सहाय्यता समूह तसेच ग्रामसंघांच्या पदाधिकार्यांनी …
Read More »खालापुरात रानडुकरांचा उच्छाद; शेतकर्यांच्या भातशेतीची नासधूस
खालापूर ः प्रतिनिधी आधीच विविध समस्यांमुळे बळीराजा त्रस्त असताना खालापूर तालुक्यातील माणकिवली परिसरात शेतकरीवर्गापुढे नवे संकट उभे राहिले आहे. येथील भातरोपांची रानडुकरांनी नासधूस केल्याने शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत. खालापूर तालुक्याला औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त असताना येथील बहुतांशी शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती …
Read More »पावसाळ्यातही खालापूरकर कोरडे; पाणीपुरवठा योजना तीन दिवसापासून बंद
खोपोली : प्रतिनिधी वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने खालापूर शहरातील कुटुंबांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून विहिरीचा आश्रय घेतला आहे. खालापूर तालुक्यातील कलोते धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी सुमारे सहा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेतील वीज पंप जळणे, कधी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper